शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Fire In Passenger Train: सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला भीषण आग, इंजिनसह दोन डबे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 09:48 IST

प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्‍टेशनवर पोहोचली तेव्हा तिच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली. यानंतर, ट्रेनमधील प्रवाशांना धूर आणि ठिणग्या निघताना दिसल्या आणि ते आरडा-ओरड करत ट्रेनमधून बाहेर पडत प्लॅटफॉर्मवर धावले.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून दिल्लीला जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला शनिवारी सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर भीषण आग लागली. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने ही घटना घडल्याचे बोलले जाते. या अपघातात रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जळून खाक झाल्याचे समजते.

प्रत्‍यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन दौराला स्‍टेशनवर पोहोचली तेव्हा तिच्या इंजिनच्या खालच्या बाजूला आग लागली. यानंतर, ट्रेनमधील प्रवाशांना धूर आणि ठिणग्या निघताना दिसल्या आणि ते आरडा-ओरड करत ट्रेनमधून बाहेर पडत प्लॅटफॉर्मवर धावले. यानंतर त्यांनी ट्रेनमधील इतर प्रवाशांना आणि चालकालाही सावध केले. ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. तसेच यावेळी अनेक लोकांनी मागच्या डब्यात बसलेल्या प्रवाशांनाही घटनेची माहिती देत सावध केले.यानंतर, बघता-बघता ट्रेनमध्ये लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केले. आग डब्ब्यांमध्येही पसरली. रेल्वे प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत इंजिनसह दोन्ही डब्यांत ही आग पूर्णपणे पसरली होती. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण ही आग एवढी भीषण होती, की काही वेळातच दोन्ही डबे जळून खाक झाले. दरम्यान, काही प्रवाशांच्या मदतीने ट्रेनचे हे डबे इतर डब्यांपासून वेगळे करण्यात आले.देवबंदपासूनच येत होता आवाज -ट्रेनमधून उतरत स्वतःचा जीव वाचवलेल्या प्रवाशांनी सांगितल्यानुसार, त्यांना देवबंदपासूनच काही आवाज आणि वासही येत होते. मात्र, याचे कारण कुणालाही समजत नव्हते. नंतर, अचानकपणे सीटखालून धूर निघू लागला. धूर अधिक वाढल्यानंतर, प्रवाशांची धावपळ उडाली आणि दौराला स्‍टेशनवर गाडी थांबताच प्रवासी आरडा-ओरड करत गाडीतून बाहेर पडले. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशdelhiदिल्लीrailwayरेल्वेpassengerप्रवासी