शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Uttar Pradesh Election: भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी; पक्षातील विरोधकांच्या पराभवासाठीच प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 06:39 IST

भाजपशी लढताहेत पक्षातीलच गट, भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे.

शरद गुप्ता

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानाने हे स्पष्ट संकेत दिले की, भाजपकडून चांगली कामगिरी होत नाही. यासाठी समाजवादी पार्टी- राष्ट्रीय लोकदल (सपा-रालोद) युतीची भूमिका कमी स्वत: भाजपमधील अंतर्गत राजकारण जास्त जबाबदार आहे.

भाजप नेत्यांचे जास्त लक्ष सपा-रालोद युतीला पराभूत करण्याऐवजी पक्षातील आपल्या अंतर्गत शत्रूंना पराभूत करण्याकडे आहे. म्हणून गोरखपूरमध्ये ना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मार्ग सोपा आहे ना कौशांबीच्या सिराथू मतदारसंघात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा. भाजपमधील एक गट मौर्य यांच्याविरोधात उभ्या असलेल्या सपा युतीच्या पल्लवी पटेल यांना रसद पुरवत आहे तर दुसरा गट गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांच्याविरोधात काम करीत आहे.

मतभेद आणि समन्वयाची टंचाई फक्त राज्यस्तरीय नेत्यांमध्येच आहे असे नाही तर केंद्रीय नेत्यांमध्येही ती आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे समर्थकही एक दुसऱ्याच्या विरोधात काम करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टप्प्यात एकाही सभेत भाषण न करण्याचा घेतलेला निर्णयही याच घटनांशी जोडून बघितला जात आहे. खराब हवामानाला दोष देत ते बिजनोरला गेले नाहीत तर, योगी आदित्यनााथ यांचे हेलिकॉप्टर त्याच हवामानात बिजनोरमध्ये उतरले व त्यांनी सभेत भाषणही केले.

१९९९ मधील वातावरणभाजपच्या वरिष्ठ नेत्याने या परिस्थितीचे वर्णन १९९९ मधील लोकसभा निवडणुकीसारखे वातावरण आहे, अशा शब्दांत केले. तेव्हा राज्यात भाजपमध्ये कल्याण सिंह, राजनाथ सिंह, कलराज मिश्रा, लालजी टंडन यांच्यासह अनेक गट एकमेकांविरोधात काम करीत होते. त्यामुळे १९९८ मध्ये भाजपने राज्यात ५८ जागा जिंकल्या होत्या त्या १९९९ मध्ये २९ वर आल्या.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी