शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

लॉकडाउन उल्लंघनात दाखल खटले होणार रद्द, CM योगींचा निर्णय; 2.5 लाख लोकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 19:58 IST

योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल. (Uttar Pradesh)

लखनौ -उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने एक मोठा निर्णय घेत लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी केवळ व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात आले होते. (Uttar Pradesh Cases filed against people for lockdown violation will be cancelled)

योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल.

वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल

यापूर्वी, सरकारने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील सर्व व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर कायदामंत्री बृजेश पाठक यांनी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळाकरण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

राज्य सरकारचे म्हणणे आहे, की कोविडसंदर्भातील खटल्यांमुळे लोकांना अनावश्यक त्रासाचा सामना करावा लागेल. आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे खटे मागे घेणे आवश्यक आहे.

सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...

खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य -कोरोना संक्रमण काळात लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील हजारो व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या