शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउन उल्लंघनात दाखल खटले होणार रद्द, CM योगींचा निर्णय; 2.5 लाख लोकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 19:58 IST

योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल. (Uttar Pradesh)

लखनौ -उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने एक मोठा निर्णय घेत लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी केवळ व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात आले होते. (Uttar Pradesh Cases filed against people for lockdown violation will be cancelled)

योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल.

वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल

यापूर्वी, सरकारने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील सर्व व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर कायदामंत्री बृजेश पाठक यांनी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळाकरण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

राज्य सरकारचे म्हणणे आहे, की कोविडसंदर्भातील खटल्यांमुळे लोकांना अनावश्यक त्रासाचा सामना करावा लागेल. आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे खटे मागे घेणे आवश्यक आहे.

सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...

खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य -कोरोना संक्रमण काळात लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील हजारो व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या