शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

"साहेब, मंत्र्यांच्या लोकांनी आमची जमीन बळकावली"; शेतकऱ्याने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:12 IST

एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर अतिक्रमण झाल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे एका शेतकऱ्याच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर अतिक्रमण झाल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्याचा आरोप आहे की, गुंडांनी आधी त्याच्या शेतालगतची जमीन घेतली. यानंतर त्याची जमीनही ताब्यात घेण्यात आली. याबाबत त्याने जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, मात्र कोणतीही सुनावणी झाली नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे. ज्यांनी जमिनीवर कब्जा केला ते सर्व सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. जमिनीवर बेकायदेशीर प्लान्टिंग केलं जात असल्याचं देखील सांगितलं.

हे संपूर्ण प्रकरण मैनपुरी कोतवाली भागातील धाराऊ रोडचं आहे. या रस्त्यालगत कामता प्रसाद यांची शेतजमीन आहे. माझ्या जमिनीचे क्षेत्रफळ आधीच कमी असल्याचा आरोप कामता प्रसाद यांचा मुलगा उमेश याने केला आहे. तीन महिन्यांपूर्वी हरिशरण पचौरी नावाच्या व्यक्तीने आमचा छळ सुरू केला. मी शेत नांगरायला गेलो असता त्यांनी ट्रॅक्टर चालकाचा पाठलाग त्याला परत पाठवलं. मला शिवीगाळ केली आणि पोलिसांच्या संगनमताने मला पोलीस ठाण्यात बसवलं.

हरिशरण याने पचौरी पोलीस ठाणे गाठले. मला बबलू पांडेच्या घरी जावे लागेल असे सांगितले. माझ्या वडिलांना बबलूच्या घरी धमकावून संमतीपत्र लिहायला लावले आणि लेखापालाच्या संगनमताने माझ्या जमिनीचे मोजमाप करण्यात आले. बबलू पांडे हा मंत्री जयवीर सिंग यांचा खास माणूस असल्याचं उमेश सांगतो. तक्रार करूनही पोलिसांनी ऐकलं नाही. उलट पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सेंगर यांनी माझे वडील आणि भावाला निघून जा अन्यथा मी तुम्हाला जेलमध्ये टाकेन असं सांगितलं.

पोलिसांनी आमच्या घरातील महिलांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणलं. हे सर्व राजकारण्यांच्या दबावाखाली केले जात आहे. उमेशच्या भावाने सांगितलं की, जेव्हा आम्ही या लोकांना जेसीबी चालवण्यापासून रोखलं तेव्हा यांनी माझ्या अपंग भावाचं डोकं फो़डलं आणि पोलिसांनी आम्हालाच पोलीस ठाण्यात नेलं. त्याचवेळी आम्ही घटनास्थळी गेलो असता जमीन बळकावल्याचा आरोप असलेले हरिशरण पचौरी आम्हाला दिसले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी