शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तर प्रदेशात अवतरली बुलेट ट्रेन, ताशी 409 किमी वेगाने धावली रेल्वे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:40 IST

वेगवान ट्रेनमध्ये बसून काही तासांमध्ये दोन राज्यांमधले अंतर काटायचे हे भारतीयांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. मात्र उत्तर प्रदेशात मात्र सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या रेल्वेलाच बुलेटच्या वेगाने चालवून तिचीच बुलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

नवी दिल्ली- अहमदाबाद ते मुंबई असा बुलेट ट्रेनचा कागदावर प्रस्ताव असला तरी तिला होणारा विरोध पाहाता भारतात बुलेट ट्रेन कधी येईल हे सांगता येत नाही. वेगवान ट्रेनमध्ये बसून काही तासांमध्ये दोन राज्यांमधले अंतर काटायचे हे भारतीयांचे स्वप्न लवकर पूर्ण होईल असे सध्या तरी दिसत नाही. मात्र उत्तर प्रदेशात मात्र सध्या अस्तित्त्वात असणाऱ्या रेल्वेलाच बुलेटच्या वेगाने चालवून तिचीच बुलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.उत्तर प्रदेशात काही रेल्वे बुलेट ट्रेनच्या वेगाने धावल्याची नोंद करण्यात आली असून कॅगच्या तपासणीमध्ये ही सगळी कागदावरची धावाधाव समोर आली आहे, रेल्वेने ठेवलेल्या वेगाच्या नोंदीमध्ये प्रचंड प्रमाणात अफरातफर झाल्याचे दिसून आले. अलाहाबाद दुरांतो एक्सप्रेस, जयपूर-अलाहाबाद एक्सप्रेस, प्रयागराज एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांचे ऑडिट कॅगने केले. त्यामध्ये हा सर्व बेबनाव लक्षात आला आहे. 7 जुलै 2016 रोजी अलाहाबाग दुरांतो एक्सप्रेस फतेहपूर स्थानकावर सकाळी 5 वाजून 53 मिनिटांनी पोहोचली. आणि अलाहाबादमध्ये सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी. म्हणजे  या दोन स्थानकांमधील 117 किमीचे अंतर रेल्वेने केवळ 17 मिनिटांत पूर्ण केल्याची नोंद कागदावर झालेली आहे. जर तसे प्रत्यक्षात झाले असते तर या रेल्वेचा वेग 409 किमी प्रतीतास होतो. मात्र प्रत्यक्षात ही रेल्वे कमाल 130 किमी वेगाने धावू शकते. जर कमाल 130 किमी वेगाने जरी रेल्वेने प्रवास केला असता तरीही या अंतरासाठी 53 मिनिटांचा अवधी लागला असता.जयपूर अलाहाबद एक्सप्रेसच्या बाबतीतही असेच झाले असून 10 एप्रिल 2017 रोदी फतेहपूरला सकाळी 5 वाजून 56 मिनिटांनी आलेली ही ट्रेन अलाहाबादला सकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी म्हणजे त्यावेळेच्या कितीतरी आधी पोहोचल्याचे दाखविण्यात आले. आता हे घड्याळाचे काटे उलटे कसे फिरले याचे उत्तर रेल्वे अधिकाऱ्यांनाच विचारायला हवे.कॅगच्या मते असे गोंधळ रेल्वेच्या इतर विभागांमध्येही झाले असावेत. तर रेल्वे अधिकारी ही मानवी चूक असल्याचे सांगत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेBullet Trainबुलेट ट्रेन