शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आणखी एक लहान भाऊ भाजपला ताकद दाखवण्याच्या तयारीत; थेट २०० जागा लढवण्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2021 15:19 IST

भाजपसोबत बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जेडीयूची उत्तर प्रदेशात आव्हानाची भाषा

लखनऊ: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक पुढील लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल समजली जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची सत्ता कायम राखण्यासाठी भारतीय जनता पक्षानं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेशात भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे. मात्र बिहारमध्ये भाजपसोबत सत्तेत असलेल्या संयुक्त जनता दलानं उत्तर प्रदेशात २०० जागांवर निवडणूक लढवण्याचा संकल्प केला आहे.

बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे. जेडीयूचे नीतीश कुमार मुख्यमंत्री आहेत. मात्र उत्तर प्रदेशात जेडीयूनं भाजपला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. जेडीयू २०० जागांवर उमेदवार देईल, अशी माहिती पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. त्यागी यांनी दिली. 'योगी सरकारबद्दल लोकांच्या मनात नाराजी आहे. सर्वांना सारखा वाटा मिळायला आहे. प्रत्येकाला स्वत:चा अधिकार हवा आहे. उत्तर प्रदेशात भाजपसोबत जागावाटपाचा तिढा न सुटल्यास आम्ही लहान पक्षांसोबत जाऊ,' असं त्यागी म्हणाले.

'उत्तर प्रदेशात शेतकरी आणि मागास वर्गांना न्याय मिळत नाही. आम्ही २०० जागांवर उमेदवार देऊ. यातील बहुतांश उमेदवार शेतकरी आणि मागास वर्गीय असतील. याच वर्गांनी योगी आणि मोदींना सत्तेत आणलं आहे,' असं त्यागी यांनी म्हटलं. तुम्ही भाजपप्रणित एनडीएचा भाग आहात, याबद्दल विचारणा केली असता, आमचं प्राधान्य भाजपसोबत निवडणूक लढण्याला आहे. मात्र जागावाटपावरून बातचीत फिस्कटल्यास आम्ही कोणाहीसोबत जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला. समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करणार का, असा प्रश्न विचारला असता, नेताजींसोबत (मुलायम सिंह यादव) आमचे चांगले संबंध आहेत. मात्र आम्ही समाजवादी पक्षासोबत जाणार नाही. एमआयएमसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यागींनी सांगितलं. 

टॅग्स :BJPभाजपाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ