शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:26 IST

Narendra Modi News : चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले.

नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही लस लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतास दूरसंचार उत्पादने, त्यांचे डिझाइन, विकास आणि निर्मिती याचे मोठे केंद्र बनविण्याची सरकारची योजना आहे. येत्या तीन वर्षांत प्रत्येक गाव व खेडे हायस्पीड फायबरने जोेडले जाईल. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. भारतातील मोबाइल दर सर्वाधिक कमी आहेत. आपला ॲप बाजार सर्वाधिक वेगाने वाढत आहे. मोदी यांनी सांगितले की, ५जी मोबाइल सेवा लवकर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ‘मल्टी-जीबीपीएस पीक डेटा स्पीड’ उपलब्ध होऊ शकेल. ‘५-जी’साठी ४-जी मजबूत करा - रविशंकर प्रसाद नवी दिल्ली : देशात ५-जी तंत्रज्ञानाची वाट सुकर करण्यासाठी भारतीय कंपन्या व तंत्रज्ञांनी आधी ४-जी व्यवस्था मजबूत करावी, असे आवाहन विधि, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.इंडियामोबाइल काँग्रेसला संबोधित करताना प्रसाद यांनी सांगितले की, आता उपलब्ध असलेली ४-जी तंत्रज्ञान व्यवस्था अधिक मजबूत होणे हे भारतीय सुरक्षेसाठीही महत्त्वाचे आहे. भारताकडे गुणवत्ता आणि नावीन्याची उत्तम ऊर्मी आहे. ५-जी निर्मितीत पुढे जायचे असेल तर ४-जी प्रक्रिया मजबूत होणे अत्यावश्यक आहे, असेही या वेळी म्हणाले  

साथीमुळे डिजिटीकरणास गती : मित्तलभारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे देशाच्या डिजिटीकरणास गती मिळाली आहे. विविध उत्पादने आणि सेवा यांच्या डिजिटल पर्यायांची स्वीकारार्हता वाढली आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत ५जी मोबाइल तंत्रज्ञान सामान्य होईल. 

२०२१मध्ये आणणार  ५ जी : मुकेश अंबानी२०२१च्या दुसऱ्या सहामाहीत देशात ५जी मोबाइल सेवा सुरू होईल, असे सूतोवाच रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केले. मोबाइलचे हार्डवेअर उत्पादनही भारतात व्हायला हवे, तसेच अजूनही २जी फोन वापरणाऱ्या ३०० दशलक्ष ग्राहकांच्या हाती स्मार्टफोन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे, असा आग्रह त्यांनी धरला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी