शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

कोविड लसीकरणासाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 06:26 IST

Narendra Modi News : चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले.

नवी दिल्ली : कोविड-१९ लसीकरण मोहिमेसाठी मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ही लस लवकरच उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे, असेही त्यांनी सांगितले.चौथ्या ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’चे (आयएमसी-२०२०) उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भारतास दूरसंचार उत्पादने, त्यांचे डिझाइन, विकास आणि निर्मिती याचे मोठे केंद्र बनविण्याची सरकारची योजना आहे. येत्या तीन वर्षांत प्रत्येक गाव व खेडे हायस्पीड फायबरने जोेडले जाईल. त्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. भारतातील मोबाइल दर सर्वाधिक कमी आहेत. आपला ॲप बाजार सर्वाधिक वेगाने वाढत आहे. मोदी यांनी सांगितले की, ५जी मोबाइल सेवा लवकर सुरू करण्याची गरज आहे. त्यामुळे ‘मल्टी-जीबीपीएस पीक डेटा स्पीड’ उपलब्ध होऊ शकेल. ‘५-जी’साठी ४-जी मजबूत करा - रविशंकर प्रसाद नवी दिल्ली : देशात ५-जी तंत्रज्ञानाची वाट सुकर करण्यासाठी भारतीय कंपन्या व तंत्रज्ञांनी आधी ४-जी व्यवस्था मजबूत करावी, असे आवाहन विधि, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले.इंडियामोबाइल काँग्रेसला संबोधित करताना प्रसाद यांनी सांगितले की, आता उपलब्ध असलेली ४-जी तंत्रज्ञान व्यवस्था अधिक मजबूत होणे हे भारतीय सुरक्षेसाठीही महत्त्वाचे आहे. भारताकडे गुणवत्ता आणि नावीन्याची उत्तम ऊर्मी आहे. ५-जी निर्मितीत पुढे जायचे असेल तर ४-जी प्रक्रिया मजबूत होणे अत्यावश्यक आहे, असेही या वेळी म्हणाले  

साथीमुळे डिजिटीकरणास गती : मित्तलभारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, कोविड-१९ साथीमुळे देशाच्या डिजिटीकरणास गती मिळाली आहे. विविध उत्पादने आणि सेवा यांच्या डिजिटल पर्यायांची स्वीकारार्हता वाढली आहे. आगामी दोन ते तीन वर्षांत ५जी मोबाइल तंत्रज्ञान सामान्य होईल. 

२०२१मध्ये आणणार  ५ जी : मुकेश अंबानी२०२१च्या दुसऱ्या सहामाहीत देशात ५जी मोबाइल सेवा सुरू होईल, असे सूतोवाच रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केले. मोबाइलचे हार्डवेअर उत्पादनही भारतात व्हायला हवे, तसेच अजूनही २जी फोन वापरणाऱ्या ३०० दशलक्ष ग्राहकांच्या हाती स्मार्टफोन देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्याची गरज आहे, असा आग्रह त्यांनी धरला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी