शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“भारताच्या सीमेवर १९५९ पासूनच चीनने गाव वसवलेय, आता काही करता येणार नाही!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:27 IST

चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली: गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील वाढलेला संघर्ष अद्याप शमलेला नाही. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, त्या निष्फळ ठरल्या. यातच चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील गावात बुलेट ट्रेनची सेवा विस्तारली. यानंतर या भागात तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. 

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अलीकडेच एक रिपोर्ट दिला असून, यानुसार, चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश या दरम्यान असलेल्या वादग्रस्त भागावर चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टसंदर्भात भारतीय संरक्षण विभागाने उत्तर दिले आहे. 

या बाबतीत आता काही करता येणार नाही

एका भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशचे वरच्या भागात सीमेजवळ असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त भागात चीनने १९५९ मध्येच कब्जा केला आहे. या ठिकाणी १०० घरांचे एक गावच वसवले गेले आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील सदर भाग भारताचा अधिकार असल्याचा दावा आम्ही आधीपासून करत आहोत. मात्र, या भागावर चीनने कब्जा केला आहे. आता यावर काही करता येऊ शकत नाही, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

सदर भागात अचानक काही झालेले नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील सीमान्त भागात १९५९ मध्ये एका ऑपरेशन अंतर्गत आसाम रायफल्सच्या एका चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला होता. यानंतर या भागात चीनने गाव वसवण्यास सुरुवात केली. या भागात चिनी सैन्याची एक चौकीही आहे. सदर भागात अचानक काही झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. 

दरम्यान, अमेरिकेने केलेला दावा चीनने फेटाळून लावला आहे. चीनने सॅटेलाइट चित्रे जारी करून त्या भागात काही बांधकाम करण्यात आलेले नाही, हे सांगितले आहे. दुसरीकडे, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३ हजार ४८८ किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जियाओकांग मॉडेल सीमा भागातील संरक्षण गावे वसवत आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशladakhलडाख