शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

“भारताच्या सीमेवर १९५९ पासूनच चीनने गाव वसवलेय, आता काही करता येणार नाही!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:27 IST

चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली: गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील वाढलेला संघर्ष अद्याप शमलेला नाही. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, त्या निष्फळ ठरल्या. यातच चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील गावात बुलेट ट्रेनची सेवा विस्तारली. यानंतर या भागात तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. 

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अलीकडेच एक रिपोर्ट दिला असून, यानुसार, चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश या दरम्यान असलेल्या वादग्रस्त भागावर चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टसंदर्भात भारतीय संरक्षण विभागाने उत्तर दिले आहे. 

या बाबतीत आता काही करता येणार नाही

एका भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशचे वरच्या भागात सीमेजवळ असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त भागात चीनने १९५९ मध्येच कब्जा केला आहे. या ठिकाणी १०० घरांचे एक गावच वसवले गेले आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील सदर भाग भारताचा अधिकार असल्याचा दावा आम्ही आधीपासून करत आहोत. मात्र, या भागावर चीनने कब्जा केला आहे. आता यावर काही करता येऊ शकत नाही, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

सदर भागात अचानक काही झालेले नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील सीमान्त भागात १९५९ मध्ये एका ऑपरेशन अंतर्गत आसाम रायफल्सच्या एका चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला होता. यानंतर या भागात चीनने गाव वसवण्यास सुरुवात केली. या भागात चिनी सैन्याची एक चौकीही आहे. सदर भागात अचानक काही झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. 

दरम्यान, अमेरिकेने केलेला दावा चीनने फेटाळून लावला आहे. चीनने सॅटेलाइट चित्रे जारी करून त्या भागात काही बांधकाम करण्यात आलेले नाही, हे सांगितले आहे. दुसरीकडे, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३ हजार ४८८ किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जियाओकांग मॉडेल सीमा भागातील संरक्षण गावे वसवत आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशladakhलडाख