शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

“भारताच्या सीमेवर १९५९ पासूनच चीनने गाव वसवलेय, आता काही करता येणार नाही!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:27 IST

चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. 

नवी दिल्ली: गेल्या वर्षीच्या जून महिन्यापासून भारत आणि चीनमधील वाढलेला संघर्ष अद्याप शमलेला नाही. लडाख येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेबाबत दोन्ही देशांमध्ये अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, त्या निष्फळ ठरल्या. यातच चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील गावात बुलेट ट्रेनची सेवा विस्तारली. यानंतर या भागात तणाव वाढल्याचे पाहायला मिळाले. यानंतर चीनने स्वायत्त तिबेट क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश दरम्यानच्या वादग्रस्त भागात गाव वसवल्याचे सांगितले जात आहे. 

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने अलीकडेच एक रिपोर्ट दिला असून, यानुसार, चीनने तिबेट स्वायत्त क्षेत्र आणि अरुणाचल प्रदेश या दरम्यान असलेल्या वादग्रस्त भागावर चीनने १०० घरांचे एक छोटे गाव वसवले असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टसंदर्भात भारतीय संरक्षण विभागाने उत्तर दिले आहे. 

या बाबतीत आता काही करता येणार नाही

एका भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशचे वरच्या भागात सीमेजवळ असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यातील वादग्रस्त भागात चीनने १९५९ मध्येच कब्जा केला आहे. या ठिकाणी १०० घरांचे एक गावच वसवले गेले आहे. सुबनसिरी जिल्ह्यातील सदर भाग भारताचा अधिकार असल्याचा दावा आम्ही आधीपासून करत आहोत. मात्र, या भागावर चीनने कब्जा केला आहे. आता यावर काही करता येऊ शकत नाही, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

सदर भागात अचानक काही झालेले नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशमधील सीमान्त भागात १९५९ मध्ये एका ऑपरेशन अंतर्गत आसाम रायफल्सच्या एका चौकीवर हल्ला करून ताबा मिळवला होता. यानंतर या भागात चीनने गाव वसवण्यास सुरुवात केली. या भागात चिनी सैन्याची एक चौकीही आहे. सदर भागात अचानक काही झालेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. 

दरम्यान, अमेरिकेने केलेला दावा चीनने फेटाळून लावला आहे. चीनने सॅटेलाइट चित्रे जारी करून त्या भागात काही बांधकाम करण्यात आलेले नाही, हे सांगितले आहे. दुसरीकडे, पूर्व लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३ हजार ४८८ किमी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जियाओकांग मॉडेल सीमा भागातील संरक्षण गावे वसवत आहे.  

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावArunachal Pradeshअरुणाचल प्रदेशladakhलडाख