शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:24 IST

ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 

UPSC परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. पण अनेक जण प्रचंड मेहनत करून घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 

कटिहार येथील रहिवासी असलेल्या अनुराग कुमार यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. अनुराग यांनी आठवीपर्यंत हिंदी माध्यमात शिक्षण घेतलं होतं. यानंतर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात आला. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते पण खूप मेहनती होते. या मेहनतीच्या जोरावर त्यांनी दहावीत ९० टक्के गुण मिळवले होते. 

बारावीतही चांगले गुण मिळाले होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण अनुराग पदवीच्या पहिल्या वर्षात अनेक विषयात नापास झाले. यानंतर त्यांनी पुन्हा पेपर दिला आणि सर्व विषय उत्तीर्ण झाले. पदवीनंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

2017 मध्ये अनुरागने 677 रँक मिळवला होता. पण ते आयएएस होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि 2018 मध्ये 48 वा क्रमांक मिळवून आयएएस पद मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी ते सेल्फ स्टडीमध्ये वेळ घालवत असत. त्यांनी परीक्षेची जोरदार तयारी केली आणि यश मिळवलं.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी