शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

कष्टाचं फळ! ग्रॅज्युएशनमध्ये नापास पण हार नाही मानली; मेहनतीने झाला IAS ऑफिसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:24 IST

ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 

UPSC परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. पण अनेक जण प्रचंड मेहनत करून घवघवीत यश संपादन करतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ग्रॅज्युएशनमध्ये नापास झाला पण त्याने हार मानली नाही. पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरू केला आणि IAS झाला आहे. त्याच्यापासून अनेकांना आता प्रेरणा मिळत आहे. 

कटिहार येथील रहिवासी असलेल्या अनुराग कुमार यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. अनुराग यांनी आठवीपर्यंत हिंदी माध्यमात शिक्षण घेतलं होतं. यानंतर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश घेण्यात आला. त्यामुळे इंग्रजी भाषेचा अभ्यास करताना त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला. ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते पण खूप मेहनती होते. या मेहनतीच्या जोरावर त्यांनी दहावीत ९० टक्के गुण मिळवले होते. 

बारावीतही चांगले गुण मिळाले होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण अनुराग पदवीच्या पहिल्या वर्षात अनेक विषयात नापास झाले. यानंतर त्यांनी पुन्हा पेपर दिला आणि सर्व विषय उत्तीर्ण झाले. पदवीनंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

2017 मध्ये अनुरागने 677 रँक मिळवला होता. पण ते आयएएस होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि 2018 मध्ये 48 वा क्रमांक मिळवून आयएएस पद मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं. निरुपयोगी गोष्टींमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी ते सेल्फ स्टडीमध्ये वेळ घालवत असत. त्यांनी परीक्षेची जोरदार तयारी केली आणि यश मिळवलं.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी