शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आईला दिलेले IAS होण्याचे वचन, पण..; विजेचा धक्क्याने एकुलत्या एक मुलाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 19:30 IST

निलेशने UPSC-2024 ची प्रीलिम्स पास करुन मेन्सची तयारी सुरू केली, पण नियतीने घात केला.

नवी दिल्ली : देशातील लाखो तरुण UPSC परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. य परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेकजण राजधानी दिल्लीची वाट धरतात. पण, याच दिल्लीला येणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या निलेश राय नावाच्या तरुणाला हाकनाक आपला जीव गमवावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राय उत्तर प्रदेशातील गाझीपूरचा रहिवासी होता. IAS अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला निलेश युपीएससीची तयारी करण्यासाठी दिल्लीला आला. घटनेच्या दिवशी दिल्लीत खुप पाऊस पडला होता. पटेल नगरमध्ये राहणारा नितीन सामान आणण्यासाठी घराबाहेर पडला. घरी आल्यावर त्याने आत जाण्यासाठी लोखंडी गेटला हात लावला अन् त्याला विजेचा तीव्र झटका बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच निलशचे संपूर्ण कुटुंब दिल्लीत आले आणि त्याचा मृतदेह गाझीपूरला आणल्यानंतर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून निलेशच्या आईने एकच टाहो फोडला. IAS होण्याचे वचन दिलेला निलेश असा परत येईल, याचा विचारही कुणी केला नव्हता. निलेशचे वडील नरेंद्र नाथ राय व्यवसायाने वकील आहेत. यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि यासाठी दिल्ली सरकार जबाबदार धरले आहे.

वीज विभाग दिल्ली सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे दिल्ली सरकारच यासाठी जबाबदार आहे. योग्य व्यवस्था असती, तर आज माझा मुलगा जिवंत असता, असे ते म्हणाले. तसेच, या घटनेनंतर प्रशासन किंवा दिल्ली सरकारने आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही. तिथे शिकणाऱ्या इतर मुलांनी निलेशसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिल्याचेही त्यांनी सांगितले. आता याप्रकरणी भाजपदेखील आप सरकारवर हल्लाबोल करत आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNew Delhiनवी दिल्लीDeathमृत्यूelectricityवीज