शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएने ‘आधार’ मनापासून लागू केली नाही, अरुण जेटलींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:49 IST

वित्तमंत्री जेटली यांची टीका : फेसबुकवर लिहिला ब्लॉग

नवी दिल्ली : आधारबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए साशंक होती. त्यामुळे या आघाडी सरकारने आधारची योजना मनापासून लागू केली नाही, अशी टीका केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. हीच आधारची योजना नंतर कलाटणी देणारी ठरली, असेही त्यांनी म्हटले आहे.

फेसबुकवरील आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आधार योजना अमलात आणण्याचे श्रेय घेण्याऐवजी काँग्रेसने तिच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हा पक्ष आधारविरोधी आहे अशी प्रतिमा निर्माण झाली. आधारबाबत कालांतराने नरेंद्र मोदी यांनीच ठाम निर्णय घेतले. अरुण जेटली म्हणाले की, यूपीएच्या काळात संसदेत संमत झालेले आधार विधेयक हे अपुरे होते. व्यक्तीचे खासगीपण जपण्यासंदर्भात त्यात योग्य त्या तरतुदी केलेल्या नव्हत्या. आधार योजनेचा फेरआढावा घेऊन त्याबद्दलच्या विधेयकाचे संपूर्ण स्वरूपच मोदी सरकारने बदलले. देशाच्या विकासासाठी आधार योजनेचा योग्य उपयोग आम्ही करून घेतला.सरकारचे ९० हजार कोटी वाचविलेजेटली यांनी म्हटले आहे की, सरकारकडून जनतेला विविध योजनांद्वारे आर्थिक साहाय्य, तसेच सबसिडी दिली जाते. त्यातील काही लाभार्थी हयात नसतात. बनावट लाभार्थी अशा योजनांचा लाभ उठवितात. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आधारच्या नव्या कायद्यात योग्य तरतुदी करण्यात आल्या. देशातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहुतांश नागरिकांना आता आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे सरकारी मदत योग्य त्या व्यक्तीसच मिळू लागली. या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारचे गेल्या काही वर्षांत ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीAdhar Cardआधार कार्डcongressकाँग्रेस