शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

यूपीएने ‘आधार’ मनापासून लागू केली नाही, अरुण जेटलींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:49 IST

वित्तमंत्री जेटली यांची टीका : फेसबुकवर लिहिला ब्लॉग

नवी दिल्ली : आधारबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए साशंक होती. त्यामुळे या आघाडी सरकारने आधारची योजना मनापासून लागू केली नाही, अशी टीका केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. हीच आधारची योजना नंतर कलाटणी देणारी ठरली, असेही त्यांनी म्हटले आहे.

फेसबुकवरील आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आधार योजना अमलात आणण्याचे श्रेय घेण्याऐवजी काँग्रेसने तिच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हा पक्ष आधारविरोधी आहे अशी प्रतिमा निर्माण झाली. आधारबाबत कालांतराने नरेंद्र मोदी यांनीच ठाम निर्णय घेतले. अरुण जेटली म्हणाले की, यूपीएच्या काळात संसदेत संमत झालेले आधार विधेयक हे अपुरे होते. व्यक्तीचे खासगीपण जपण्यासंदर्भात त्यात योग्य त्या तरतुदी केलेल्या नव्हत्या. आधार योजनेचा फेरआढावा घेऊन त्याबद्दलच्या विधेयकाचे संपूर्ण स्वरूपच मोदी सरकारने बदलले. देशाच्या विकासासाठी आधार योजनेचा योग्य उपयोग आम्ही करून घेतला.सरकारचे ९० हजार कोटी वाचविलेजेटली यांनी म्हटले आहे की, सरकारकडून जनतेला विविध योजनांद्वारे आर्थिक साहाय्य, तसेच सबसिडी दिली जाते. त्यातील काही लाभार्थी हयात नसतात. बनावट लाभार्थी अशा योजनांचा लाभ उठवितात. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आधारच्या नव्या कायद्यात योग्य तरतुदी करण्यात आल्या. देशातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहुतांश नागरिकांना आता आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे सरकारी मदत योग्य त्या व्यक्तीसच मिळू लागली. या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारचे गेल्या काही वर्षांत ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीAdhar Cardआधार कार्डcongressकाँग्रेस