शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

यूपीएने ‘आधार’ मनापासून लागू केली नाही, अरुण जेटलींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 07:49 IST

वित्तमंत्री जेटली यांची टीका : फेसबुकवर लिहिला ब्लॉग

नवी दिल्ली : आधारबाबत काँग्रेसप्रणीत यूपीए साशंक होती. त्यामुळे या आघाडी सरकारने आधारची योजना मनापासून लागू केली नाही, अशी टीका केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. हीच आधारची योजना नंतर कलाटणी देणारी ठरली, असेही त्यांनी म्हटले आहे.

फेसबुकवरील आपल्या ताज्या ब्लॉगमध्ये त्यांनी म्हटले आहे की, आधार योजना अमलात आणण्याचे श्रेय घेण्याऐवजी काँग्रेसने तिच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हा पक्ष आधारविरोधी आहे अशी प्रतिमा निर्माण झाली. आधारबाबत कालांतराने नरेंद्र मोदी यांनीच ठाम निर्णय घेतले. अरुण जेटली म्हणाले की, यूपीएच्या काळात संसदेत संमत झालेले आधार विधेयक हे अपुरे होते. व्यक्तीचे खासगीपण जपण्यासंदर्भात त्यात योग्य त्या तरतुदी केलेल्या नव्हत्या. आधार योजनेचा फेरआढावा घेऊन त्याबद्दलच्या विधेयकाचे संपूर्ण स्वरूपच मोदी सरकारने बदलले. देशाच्या विकासासाठी आधार योजनेचा योग्य उपयोग आम्ही करून घेतला.सरकारचे ९० हजार कोटी वाचविलेजेटली यांनी म्हटले आहे की, सरकारकडून जनतेला विविध योजनांद्वारे आर्थिक साहाय्य, तसेच सबसिडी दिली जाते. त्यातील काही लाभार्थी हयात नसतात. बनावट लाभार्थी अशा योजनांचा लाभ उठवितात. हे गैरप्रकार थांबविण्यासाठी आधारच्या नव्या कायद्यात योग्य तरतुदी करण्यात आल्या. देशातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या बहुतांश नागरिकांना आता आधार कार्ड मिळाले आहे. त्यामुळे सरकारी मदत योग्य त्या व्यक्तीसच मिळू लागली. या प्रयत्नांमुळे केंद्र सरकारचे गेल्या काही वर्षांत ९० हजार कोटी रुपये वाचले आहेत.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीAdhar Cardआधार कार्डcongressकाँग्रेस