शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

"छोटी-मोटी घटनाएं होती रहती हैं"; महाकुंभ चेंगराचेंगरीवर मंत्र्यांचं असंवेदनशील विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:18 IST

महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नेमक्या संख्येबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याचं असंवेदनशील विधान आता समोर आलं आहे. अशा छोट्या मोठ्या घटना घडत राहतात असं त्यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद म्हणाले की, "भाविकांनी जिथे जागा असेल तिथे स्नान करावं. जिथे इतकी मोठी गर्दी असते, इतकं मोठं व्यवस्थापन असतं तिथे अशा छोट्या मोठ्या घटना घडत राहतात." या घटनेबाबत विरोधी पक्षनेते सतत यूपी सरकारच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

महाकुंभात 'जागतिक दर्जाच्या व्यवस्था' असल्याचा दावा करणाऱ्यांनी चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली. जागतिक दर्जाच्या व्यवस्था करण्याच्या दाव्यांचे सत्य आता उघड झाले आहे, तेव्हा जे लोक याबद्दल दावा करत होते आणि खोटा प्रचार करत होते त्यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचा राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.

यूपी काँग्रेसचे अजय राय यांनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केलं आणि म्हणाले, "महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानाच्या दिवशी चेंगराचेंगरीमुळे अनेक लोकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी दुःखद आहे. ही दुःखद घटना गैरव्यवस्थापनाचे परिणाम आहे. योगी सरकारने सर्व पैसे केवळ ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च केले, महाकुंभात आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेवर नाही. यावरून या सरकारची असंवेदनशीलता दिसून येते.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराजyogi adityanathयोगी आदित्यनाथ