शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

"छोटी-मोटी घटनाएं होती रहती हैं"; महाकुंभ चेंगराचेंगरीवर मंत्र्यांचं असंवेदनशील विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:18 IST

महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

महाकुंभाच्या संगम परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत १० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक पवित्र स्नान करण्यासाठी आले होते. उत्तर प्रदेश सरकारने मृतांच्या नेमक्या संख्येबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. याच दरम्यान उत्तर प्रदेशातील एका मंत्र्याचं असंवेदनशील विधान आता समोर आलं आहे. अशा छोट्या मोठ्या घटना घडत राहतात असं त्यांनी म्हटलं आहे. 

उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री संजय निषाद म्हणाले की, "भाविकांनी जिथे जागा असेल तिथे स्नान करावं. जिथे इतकी मोठी गर्दी असते, इतकं मोठं व्यवस्थापन असतं तिथे अशा छोट्या मोठ्या घटना घडत राहतात." या घटनेबाबत विरोधी पक्षनेते सतत यूपी सरकारच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

महाकुंभात 'जागतिक दर्जाच्या व्यवस्था' असल्याचा दावा करणाऱ्यांनी चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी घ्यावी आणि आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली. जागतिक दर्जाच्या व्यवस्था करण्याच्या दाव्यांचे सत्य आता उघड झाले आहे, तेव्हा जे लोक याबद्दल दावा करत होते आणि खोटा प्रचार करत होते त्यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचा राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.

यूपी काँग्रेसचे अजय राय यांनी चेंगराचेंगरीबद्दल दुःख व्यक्त केलं आणि म्हणाले, "महाकुंभात मौनी अमावस्येच्या स्नानाच्या दिवशी चेंगराचेंगरीमुळे अनेक लोकांचा मृत्यू आणि जखमी झाल्याची बातमी दुःखद आहे. ही दुःखद घटना गैरव्यवस्थापनाचे परिणाम आहे. योगी सरकारने सर्व पैसे केवळ ब्रँडिंग आणि मार्केटिंगवर खर्च केले, महाकुंभात आलेल्या भाविकांच्या व्यवस्थेवर नाही. यावरून या सरकारची असंवेदनशीलता दिसून येते.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPrayagrajप्रयागराजyogi adityanathयोगी आदित्यनाथ