शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:18 IST

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात अचानक एक बोलेरो कार कालव्यात पडली. या कारमध्ये एकूण १५ जण होते, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला आणि त्यावेळी किती भयानक दृश्य होते हे अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं आहे.

बोलेरोमध्ये असलेल्या एका मुलीने सांगितलं की, ते सर्वजण मंदिरात दर्शनासाठी जात होते, तेव्हा हा अपघात झाला.हा अपघात अचानक कसा झाला हे कोणाला कळलंच नाही. गाडीत सर्व जण बसले होते आणि अचानक ती पलटली, कोणालाही काहीही कळायच्या आत हा अपघात झाला. अपघातामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सर्व काही संपलं असं सांगताना मुलगी ढसाढसा रडत होती.

बोलेरो कार नियंत्रणाबाहेर गेली आणि वेगाने कालव्यात पडली. काही लोकांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. बुडणाऱ्या लोकांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडलाच नाही, ज्यामुळे ते आत अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस हे अपघाताचे कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या प्रशासन आणि बचाव पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे.

अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोस्ट करून आर्थिक मदतीची घोषणा केली. गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत संवेदना आहेत. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना ५-५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत असं म्हटलं आहे.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश