शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:21 IST

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. विभागातील निष्काळजीपण आणि असंवेदनशीलतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वीज विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आणि ग्राहक यांच्यातील संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील शेअर केलं आहे.

एका वरिष्ठ नेत्याने त्यांना हा ऑडिओ पाठवला होता. विभागीय अधिकारी जनतेच्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत असा दावा करण्यात आला आहे. ऊर्जामंत्र्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अनेक वेळा खासदार राहिलेल्या एका वरिष्ठ नेत्याने मला त्यांच्या भागातील एका सुशिक्षित नागरिक आणि वीज विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यामधील संभाषणाचा ऑडिओ पाठवला आहे आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांनी फोन उचलणं केलं बंद

ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, अधिकाऱ्यांनी फोन उचलणं आता बंद केलं आहे. आम्ही वारंवार सांगूनही अशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत.यामुळे जनता अडचणी येत आहे. शर्मा यांनी असा दावा केला की, बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केली. बैठकीत सर्वांनी सांगितलं की १९१२ (हेल्पलाइन) वरच तक्रारी नोंदवण्यासाठी कोणतेही विशेष निर्देश देण्यात आले नाहीत, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मी अनेक वेळा विचारलं, प्रत्येक वेळी मला खोटं ऐकायला मिळाले. आता तुम्ही स्वतः ऑडिओ ऐका आणि धक्कादायक वास्तव समजून घ्या.

"भयंकर परिणाम होतील..."

शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, वीज विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी समजून घ्यावी. समस्या लवकर सोडवा, चांगलया भाषेत लोकांशी संवाद साधा. अन्यथा भयंकर परिणाम होतील. ऊर्जामंत्र्यांनी एका वरिष्ठ नेत्याने पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेजही शेअर केला आहे. ज्याची आता चर्चा रंगली आहे. 

"माननीय मंत्री महोदय, बस्ती शहरातील एका मोठ्या परिसरात सकाळी १० वाजल्यापासून वीज नाही. रात्री ८ वाजेपर्यंत कोणताही अधिकारी फोन उचलत नव्हता. अधीक्षक अभियंत्यांना फोन केला तेव्हा त्यांचं वर्तन अतिशय असंवेदनशील होतं. त्यांचं बोलणे ऐकून तुम्हाला स्वतःला कळेल की, ते जनतेच्या तक्रारींप्रती किती असंवेदनशील आहेत आणि ते जाणूनबुजून सरकारची प्रतिमा खराब करत आहेत" असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीज