शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:21 IST

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. विभागातील निष्काळजीपण आणि असंवेदनशीलतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वीज विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आणि ग्राहक यांच्यातील संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील शेअर केलं आहे.

एका वरिष्ठ नेत्याने त्यांना हा ऑडिओ पाठवला होता. विभागीय अधिकारी जनतेच्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत असा दावा करण्यात आला आहे. ऊर्जामंत्र्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अनेक वेळा खासदार राहिलेल्या एका वरिष्ठ नेत्याने मला त्यांच्या भागातील एका सुशिक्षित नागरिक आणि वीज विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यामधील संभाषणाचा ऑडिओ पाठवला आहे आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांनी फोन उचलणं केलं बंद

ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, अधिकाऱ्यांनी फोन उचलणं आता बंद केलं आहे. आम्ही वारंवार सांगूनही अशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत.यामुळे जनता अडचणी येत आहे. शर्मा यांनी असा दावा केला की, बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केली. बैठकीत सर्वांनी सांगितलं की १९१२ (हेल्पलाइन) वरच तक्रारी नोंदवण्यासाठी कोणतेही विशेष निर्देश देण्यात आले नाहीत, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मी अनेक वेळा विचारलं, प्रत्येक वेळी मला खोटं ऐकायला मिळाले. आता तुम्ही स्वतः ऑडिओ ऐका आणि धक्कादायक वास्तव समजून घ्या.

"भयंकर परिणाम होतील..."

शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, वीज विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी समजून घ्यावी. समस्या लवकर सोडवा, चांगलया भाषेत लोकांशी संवाद साधा. अन्यथा भयंकर परिणाम होतील. ऊर्जामंत्र्यांनी एका वरिष्ठ नेत्याने पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेजही शेअर केला आहे. ज्याची आता चर्चा रंगली आहे. 

"माननीय मंत्री महोदय, बस्ती शहरातील एका मोठ्या परिसरात सकाळी १० वाजल्यापासून वीज नाही. रात्री ८ वाजेपर्यंत कोणताही अधिकारी फोन उचलत नव्हता. अधीक्षक अभियंत्यांना फोन केला तेव्हा त्यांचं वर्तन अतिशय असंवेदनशील होतं. त्यांचं बोलणे ऐकून तुम्हाला स्वतःला कळेल की, ते जनतेच्या तक्रारींप्रती किती असंवेदनशील आहेत आणि ते जाणूनबुजून सरकारची प्रतिमा खराब करत आहेत" असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीज