शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 10:21 IST

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशचे ऊर्जामंत्री एके शर्मा यांनी पुन्हा एकदा त्यांच्याच विभागातील अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. विभागातील निष्काळजीपण आणि असंवेदनशीलतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर वीज विभागातील एक वरिष्ठ अधिकारी आणि ग्राहक यांच्यातील संभाषणाचं ऑडिओ रेकॉर्डिंग देखील शेअर केलं आहे.

एका वरिष्ठ नेत्याने त्यांना हा ऑडिओ पाठवला होता. विभागीय अधिकारी जनतेच्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत असा दावा करण्यात आला आहे. ऊर्जामंत्र्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, अनेक वेळा खासदार राहिलेल्या एका वरिष्ठ नेत्याने मला त्यांच्या भागातील एका सुशिक्षित नागरिक आणि वीज विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यामधील संभाषणाचा ऑडिओ पाठवला आहे आणि त्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अधिकाऱ्यांनी फोन उचलणं केलं बंद

ऊर्जामंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली आणि म्हणाले, अधिकाऱ्यांनी फोन उचलणं आता बंद केलं आहे. आम्ही वारंवार सांगूनही अशा चुकीच्या गोष्टी घडत आहेत.यामुळे जनता अडचणी येत आहे. शर्मा यांनी असा दावा केला की, बैठकीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दिशाभूल केली. बैठकीत सर्वांनी सांगितलं की १९१२ (हेल्पलाइन) वरच तक्रारी नोंदवण्यासाठी कोणतेही विशेष निर्देश देण्यात आले नाहीत, परंतु मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. मी अनेक वेळा विचारलं, प्रत्येक वेळी मला खोटं ऐकायला मिळाले. आता तुम्ही स्वतः ऑडिओ ऐका आणि धक्कादायक वास्तव समजून घ्या.

"भयंकर परिणाम होतील..."

शर्मा यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, वीज विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी समजून घ्यावी. समस्या लवकर सोडवा, चांगलया भाषेत लोकांशी संवाद साधा. अन्यथा भयंकर परिणाम होतील. ऊर्जामंत्र्यांनी एका वरिष्ठ नेत्याने पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेजही शेअर केला आहे. ज्याची आता चर्चा रंगली आहे. 

"माननीय मंत्री महोदय, बस्ती शहरातील एका मोठ्या परिसरात सकाळी १० वाजल्यापासून वीज नाही. रात्री ८ वाजेपर्यंत कोणताही अधिकारी फोन उचलत नव्हता. अधीक्षक अभियंत्यांना फोन केला तेव्हा त्यांचं वर्तन अतिशय असंवेदनशील होतं. त्यांचं बोलणे ऐकून तुम्हाला स्वतःला कळेल की, ते जनतेच्या तक्रारींप्रती किती असंवेदनशील आहेत आणि ते जाणूनबुजून सरकारची प्रतिमा खराब करत आहेत" असं मेसेजमध्ये म्हटलं आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशelectricityवीज