शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"मतदारसंघातील सर्व उमेदवार जिंकतील", अनुप्रिया सिंह पटेल यांनी मिर्झापूरमध्ये केले मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:52 IST

UP Elections : उत्तर प्रदेशात मतदानाचे प्रमाण कमी आहे. सहाव्या टप्प्यात 55 टक्के मतदान झाले. त्यामुळे भाजप चिंतेत आहे.

मिर्झापूर : यंदाची उत्तर प्रदेशात होत असलेली विधानसभेची निवडणूक कमालीची अटीतटीची होत आहे. गेल्यावेळी एकतर्फी विजय मिळवणाऱ्या भाजपाची अखिलेश यादव यांच्या झंझावाती प्रचारासमोर दमछाक होत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशात सत्तापरिवर्तन होणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. 

उत्तर प्रदेश विधानसभेच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण 613 उमेदवार 54 जागांवर आपले नशीब आजमावत आहेत, ज्यात 11 अनुसूचित जातींसाठी राखीव आणि दोन अनुसूचित जमातीसाठी जवळपास 2.06 कोटी मतदारांचा समावेश आहे. तसेच, उत्तर प्रदेशात मतदानाचे प्रमाण कमी आहे. सहाव्या टप्प्यात 55 टक्के मतदान झाले. त्यामुळे भाजप चिंतेत आहे.

केंद्रीय मंत्री अनुप्रिया सिंह पटेल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मिर्झापूर येथील एका बूथवर मतदान केले. मतदान केल्यानंतर अनुप्रिया सिंह पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, "मी मिर्झापूरमध्ये मतदान केले आहे. मला विश्वास आहे की, मतदारसंघातील सर्व 5 जागांवर आमच्या एनडीएचे उमेदवार जिंकतील."

दरम्यान, आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र या जिल्ह्यांमध्ये शेवटच्या टप्प्यात मतदान सुरू आहे. या टप्प्यातील प्रमुख स्पर्धकांमध्ये उत्तर प्रदेशचे मंत्री नीलकंठ तिवारी, अनिल राजभर, रवींद्र जायस्वाल, गिरीश यादव आणि राम शंकर सिंह पटेल यांचा समावेश आहे. योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात दाखल झालेले दारा सिंह चौहान हेही मऊ येथील घोसी येथून निवडणूक लढवत आहेत.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradeshउत्तर प्रदेश