शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 08:58 IST

उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे. तापमान दररोज रेकॉर्ड मोडत आहे. उत्तर भारत आणि दिल्लीतील अनेक भागात तापमान ५० अंशांच्या जवळ पोहोचले आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेमुळे ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. पण काम करण्यासाठी मोठ्या लोकांना या कडक उन्हात घराबाहेर पडावं लागत आहे. देशाची राजधानी दिल्लीला देखील याचा फटका बसला आहे. 

जून सुरू झाल्यानंतर उत्तर भारतात सकाळपासूनच सूर्य सतत तळपत असतो. पूर्वी हे फक्त रेकॉर्ड तोडण्यापुरतच होतं. पण आता सतत होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेने ३३ हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. यामध्ये शनिवारी कानपूर आणि बुंदेलखंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. कानपूरमध्ये ४६.३, हमीरपूर ४६.२, झाशी ४६.१, वाराणसी ४६, प्रयागराज ४६ आणि आग्रा येथे ४५.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

१२८ वर्षांत बिहारला आता सर्वाधिक उष्णतेचा सामना करावा लागत आहे. पाटण्यात उष्णतेच्या लाटेचा कहर इतका आहे की, लोकांना घरांमध्येच राहावं लागत आहे. सकाळी १० वाजल्यापासूनच रस्त्यांवर अघोषित संचारबंदी आहे. देशाची राजधानी दिल्लीला डबल फटका बसला आहे. एकीकडे उष्णतेचा त्रास तर दुसरीकडे पाण्याची भीषण टंचाई. दिल्लीची परिस्थिती अशी आहे की, या कडक उन्हात लोकांना पाण्याच्या शोधात अनेक किलोमीटर दूर जावे लागते आणि तरीही पाणी मिळत नाही.

दिल्लीतील हवामान विभागाने पुढील तीन दिवस दिल्लीत भीषण गरमी आणि उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. म्हणजे उष्णतेपासून दिलासा मिळण्याची फारशी आशा नाही. मान्सूनच दिल्लीला या उष्णतेपासून वाचवू शकतो. मात्र ३० जूनपूर्वी त्यांचं आगमन होण्याची शक्यता दिसत नाही.

मान्सून कधी येणार?

आयएमडीचे शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सून दिल्लीत येण्याची वेळ ३० जूनच्या आसपास आहे. मान्सून थेट दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत नाही. आम्हाला आशा आहे की येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, बंगाल, बिहार, झारखंडच्या काही भागात मान्सूनची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे थोडे दिवस उष्णतेची लाट अशीच सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत सावधगिरी हाच उत्तम उपाय आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशTemperatureतापमानdelhiदिल्ली