शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

“जर त्यांनी सावरकरांचं ऐकलं असतं तर देशाची फाळणी झाली नसती,” योगी आदित्यनाथांचा काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2022 10:09 IST

अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये सावरकरांची प्रतिमा लावली होती, परंतु काँग्रेसनं ती हटवली, योगी आदित्यनाथांचा दावा.

“विनायक दामोदर सावरक यांच्यासारख्या क्रांतिकारक, लेखक, तत्त्वज्ञ, कवीचा अपमान करण्यात काँग्रेसनं कोणतीही कसर सोडली नाही,” असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी केला. "स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सावरकरांहून मोठे कोणीही नव्हते. स्वातंत्र्यानंतर सावरकरांना जो सन्मान मिळायला हवा होता तो दिला गेला नाही,” असं योगी आदित्यनाथ म्हणाले. हिंदुत्व हा शब्द वीर सावरकर यांनीच दिल्याचंही त्यांनी नमूद केलं.

सावरकरांच्या जयंतीनिमित्त उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी प्रकाशित केलेल्या 'वीर सावरकर - जे भारताची फाळणी रोखू शकले असते आणि त्यांचा राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीकोन' या पुस्तकाच्या प्रकाशनादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केले. “जर काँग्रेसनं सावरकरांचं म्हणणं ऐकलं तर देशाची फाळणी झाली नसती. पाकिस्तान जाईल येईल पण भारत कायम राहिलअसं सावरकर म्हणाले होते,” असंही त्यांनी नमूद केलं.

“प्रत्येक नागरिकाला अल्पसंख्याक बहुसंख्याकच्या दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा त्यांना नागरिकांच्या रुपात पाहिलं पाहेज. आम्ही उत्तर प्रदेशात हे लागू केलं आणि रस्त्यावर ना नमाज पठण होणार ना पूजा होणार हे पाहिलं,” असं योगी म्हणाले. अटल बिहारी वाजपेयी सरकारनं पोर्टब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांची प्रतिमा लावली होती, परंतु नंतर काँग्रेसनं ती हटवल्याचंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरcongressकाँग्रेस