शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
7
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
8
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
9
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
10
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
11
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
12
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
13
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
14
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
15
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
16
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
17
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
18
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
19
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
20
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना

UP Assembly Election 2022 "...तर यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही"; योगींनी शेअर केला 'तो' Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 13:09 IST

Yogi Adityanath And UP Assembly Election 2022 : "उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल."

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी 6 मिनिटांचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. "आता मोठा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. भाजपाच्या डबल इंजिन सरकारने गेल्या पाच वर्षात जे काही केले आहे ते मोठ्या बांधिलकीने केले आहे आणि जे काही सांगितले आहे, ते तुमच्यावर विश्वास ठेऊन केले आहे" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. "या निवडणुका येईपर्यंत तुम्ही सर्व काही पाहिले आणि लक्षपूर्वक ऐकले. मला मनापासून एक गोष्ट सांगायची आहे. या पाच वर्षांत खूप काही घडले. "

उत्तर प्रदेशातील एक लाख गावांमध्ये सर्व घरांमध्ये 24 तास वीज पोहोचवण्यात आली आहे, असे पहिल्यांदाच घडले आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवन कसे बदलले आहे याची काहींना कल्पनाही नसेल, असे ते पुढे म्हणाले. या 5 वर्षांत खूप काही अभूतपूर्व घडले आहे. जनतेने सावध राहा. तुम्ही चुकलात तर सर्व मेहनतीवर पाणी फिरेल आणि यावेळी यूपीचे काश्मीर, बंगाल आणि केरळ व्हायला वेळ लागणार नाही. मी इथे मत मागायला आलो नाही. पण 70 वर्षात हे काम पूर्वीच्या सरकारांना करता आले नाही, याबद्दल मी त्यांची माफी मागतो. आम्ही घरोघरी कोट्यवधी घरांमध्ये शौचालये बांधली, तुमची मते मिळवण्यासाठी हा माझा जुगाडही नव्हता."

"स्वच्छतेपेक्षाही माझ्यासाठी माता-भगिनींच्या सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न होता. प्रथमच लाखो घरे व कुटुंबांना पक्की घरे मिळाली आहेत. त्यांच्या डोळ्यातील चमक अतिशय बोलकी आहे. यापुढे शेकडो निवडणुकांतील विजयाही फिका आहे, असे ते बोलले. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण आजपर्यंत चुलीवर काम करणाऱ्या आमच्या माता-भगिनी आता आजारी पडणार नाहीत, निरोगी असतील. आयुष्मान योजना आज उत्तर प्रदेशातील कोट्यवधी कुटुंबांसाठी आजारांना तोंड देण्यासाठी आधार बनली आहे. 'हर घर नल' योजनेच्या माध्यमातून आम्ही घराघरात पाणी पुरवठा करत आहोत."

"उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही"

"एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात द्रुतगती मार्ग टाकत आहोत, राज्यभर औद्योगिक कॉरिडॉर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत हे तुम्ही पाहिले आहे. याच दरम्यान, 2 वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसच्या भयंकर महामारीने थैमान घातले आहे. सर्वात मोठे श्रीमंत आणि प्रगत देश देखील हतबल दिसले. जगभर हाहाकार माजला. लोकं रोगाने नाही पण उपासमारीने नक्कीच मरतील, असे वाटत होते. पण उत्तर प्रदेशात कोणीही उपाशी झोपणार नाही, असे आम्ही ठरवले. आम्ही कोट्यवधी कुटुंबांना रेशन द्यायला सुरुवात केली" असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाPoliticsराजकारण