शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद म्हणजे जुन्या क्लबसारखी"; परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:49 IST

एस जयशंकर यांनी थेट UNSC च्या उणिवांवरच बोट ठेवले

S Jaishankar on United Nations Security Council : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. प्रत्येक मुद्द्यावर ते अतिशय खुलेपणाने आणि रोखठोकपणे आपले मत मांडतात. त्यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) काही उणीवांवर बोट ठेवले आहे. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेची तुलना एखाद्या जुन्या क्लबशी केली आहे. या परिषदेतील काही सदस्यांना आपली पकड सैल पडू द्यायची नाही असा प्रकार दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर यांच्या मते, यामुळे जगाचे नुकसान होत आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी प्रयत्न करत आहे. त्यात स्थायी सदस्यत्वासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व आहे. बदलत्या जगासोबत हे वर्चस्व मोडीत काढावे, अशी भारताची इच्छा आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी म्हणाले की, सुरक्षा परिषद जुन्या क्लबसारखी आहे. त्यात काही असे सेट सदस्य आहेत जे त्यावरील पकड सैल पडू देण्यास इच्छित नाहीत. त्यांना क्लबचा ताबा घ्यायचा आहे. अधिक सदस्य स्वीकारण्यास ते फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे त्यांना वाटत नाही. एक प्रकारे हे मानवी अपयशच आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की आज ते जगाचे नुकसान करत आहे असे कळणे गरजेचे आहे. जगासमोरील प्रमुख समस्यांवर संयुक्त राष्ट्र संघ कमी प्रभावी दिसू लागला आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला जागतिक भावनाही सांगू शकतो. म्हणजेच, आज तुम्ही जगातील २०० देशांना विचाराल की त्यांना सुधारणा हव्या आहेत की नाही तर खूप मोठ्या संख्येने देश म्हणतील की होय, आम्हाला सुधारणा हव्या आहेत. असे असताना बदल करणे अपेक्षितच आहे.

दरम्यान, जयशंकर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाकडून पेट्रोल खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले असतानाही जयशंकर यांनी युरोपला आरसा दाखवला होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAmericaअमेरिकाIndiaभारत