शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

"संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद म्हणजे जुन्या क्लबसारखी"; परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:49 IST

एस जयशंकर यांनी थेट UNSC च्या उणिवांवरच बोट ठेवले

S Jaishankar on United Nations Security Council : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. प्रत्येक मुद्द्यावर ते अतिशय खुलेपणाने आणि रोखठोकपणे आपले मत मांडतात. त्यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) काही उणीवांवर बोट ठेवले आहे. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेची तुलना एखाद्या जुन्या क्लबशी केली आहे. या परिषदेतील काही सदस्यांना आपली पकड सैल पडू द्यायची नाही असा प्रकार दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर यांच्या मते, यामुळे जगाचे नुकसान होत आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी प्रयत्न करत आहे. त्यात स्थायी सदस्यत्वासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व आहे. बदलत्या जगासोबत हे वर्चस्व मोडीत काढावे, अशी भारताची इच्छा आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी म्हणाले की, सुरक्षा परिषद जुन्या क्लबसारखी आहे. त्यात काही असे सेट सदस्य आहेत जे त्यावरील पकड सैल पडू देण्यास इच्छित नाहीत. त्यांना क्लबचा ताबा घ्यायचा आहे. अधिक सदस्य स्वीकारण्यास ते फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे त्यांना वाटत नाही. एक प्रकारे हे मानवी अपयशच आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की आज ते जगाचे नुकसान करत आहे असे कळणे गरजेचे आहे. जगासमोरील प्रमुख समस्यांवर संयुक्त राष्ट्र संघ कमी प्रभावी दिसू लागला आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला जागतिक भावनाही सांगू शकतो. म्हणजेच, आज तुम्ही जगातील २०० देशांना विचाराल की त्यांना सुधारणा हव्या आहेत की नाही तर खूप मोठ्या संख्येने देश म्हणतील की होय, आम्हाला सुधारणा हव्या आहेत. असे असताना बदल करणे अपेक्षितच आहे.

दरम्यान, जयशंकर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाकडून पेट्रोल खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले असतानाही जयशंकर यांनी युरोपला आरसा दाखवला होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAmericaअमेरिकाIndiaभारत