शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

"संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा परिषद म्हणजे जुन्या क्लबसारखी"; परराष्ट्र मंत्र्यांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 18:49 IST

एस जयशंकर यांनी थेट UNSC च्या उणिवांवरच बोट ठेवले

S Jaishankar on United Nations Security Council : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. प्रत्येक मुद्द्यावर ते अतिशय खुलेपणाने आणि रोखठोकपणे आपले मत मांडतात. त्यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) काही उणीवांवर बोट ठेवले आहे. जयशंकर यांनी सुरक्षा परिषदेची तुलना एखाद्या जुन्या क्लबशी केली आहे. या परिषदेतील काही सदस्यांना आपली पकड सैल पडू द्यायची नाही असा प्रकार दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जयशंकर यांच्या मते, यामुळे जगाचे नुकसान होत आहे. यामुळे संयुक्त राष्ट्रांचा प्रभाव कमी होत आहे. परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी प्रयत्न करत आहे. त्यात स्थायी सदस्यत्वासाठी ते प्रबळ दावेदार आहेत. सध्या सुरक्षा परिषदेवर अमेरिका आणि पाश्चात्य देशांचे वर्चस्व आहे. बदलत्या जगासोबत हे वर्चस्व मोडीत काढावे, अशी भारताची इच्छा आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर रविवारी म्हणाले की, सुरक्षा परिषद जुन्या क्लबसारखी आहे. त्यात काही असे सेट सदस्य आहेत जे त्यावरील पकड सैल पडू देण्यास इच्छित नाहीत. त्यांना क्लबचा ताबा घ्यायचा आहे. अधिक सदस्य स्वीकारण्यास ते फारसे उत्सुक नाहीत किंवा त्यांच्या कार्यपद्धतींवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हावे असे त्यांना वाटत नाही. एक प्रकारे हे मानवी अपयशच आहे.

परराष्ट्र मंत्री म्हणाले की आज ते जगाचे नुकसान करत आहे असे कळणे गरजेचे आहे. जगासमोरील प्रमुख समस्यांवर संयुक्त राष्ट्र संघ कमी प्रभावी दिसू लागला आहे. ते म्हणाले की, मी तुम्हाला जागतिक भावनाही सांगू शकतो. म्हणजेच, आज तुम्ही जगातील २०० देशांना विचाराल की त्यांना सुधारणा हव्या आहेत की नाही तर खूप मोठ्या संख्येने देश म्हणतील की होय, आम्हाला सुधारणा हव्या आहेत. असे असताना बदल करणे अपेक्षितच आहे.

दरम्यान, जयशंकर यांच्या स्पष्टवक्तेपणामुळेच भारताचे परराष्ट्र धोरण अधिक आक्रमक झाले आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाकडून पेट्रोल खरेदीवर प्रश्न उपस्थित झाले असतानाही जयशंकर यांनी युरोपला आरसा दाखवला होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरunited nationsसंयुक्त राष्ट्र संघAmericaअमेरिकाIndiaभारत