शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

वीज विभागाचा कारनामा! दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला आलं तब्बल 26 लाखांचं बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 10:33 IST

Farmer Got 26 Lakh Electricity Bill : शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही.

उन्नाव - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. हजार, बाराशे नाही तर एका शेतकऱ्याला तब्बल 26 लाखांचं विजेचं बिल आल्याची अजब घटना समोर आली आहे. उन्नावमधील वीज विभागाच्या कारनाम्यांमुळे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला भलं मोठं बिल आलं आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाला धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी 26 लाख रुपयांचं विजेचं बिल आलं. एवढं मोठं बिल पाहून शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. रामू राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला 26 लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.

वीज विभागाचे अधिकारी उपेंद्र तिवारी यांना याबाबत विचारलं असता त्यांनी ही बाब आता आमच्या निदर्शनास आली. शेतकऱ्याचे वीज बिल तत्काळ बदलण्यात येईल असं म्हटलं आहे. तसेच तांत्रिक अडथळ्यामुळे त्याला 26 लाख रुपयांचं वीज बिल गेलं. कधी कधी मीटर 8 हजार, 80 हजार यूनिटमधून बिल जनरेट केला जातो. यानुसार आणखी वीज बिलांना तत्काळ योग्य करण्यात येईल असं देखील उपेंद्र यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये इलेक्ट्रीसिटी विभागाने शेतकऱ्याला तब्बल 64 लाखांचं बिल पाठवलं होतं. इतकचं नाही तर बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याला नोटीसही पाठविली होती. 29 जुलै 2020 मध्ये शिवकुमार यांच्या पत्नी सुनीता देवीच्या नावावर तब्बल 64,02,507 रकमेची नोटीस आली होती. 8 ऑगस्टपर्यंत हे बिल जमा करण्याचे निर्देश त्यामध्ये देण्यात आले होते. ही नोटीस मिळताच शिवकुमारचे कुटुंबीय चिंतेत होते. आपली सर्व संपत्ती विकली तरी तो हे बिल भरू शकत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं होतं. घरात केवळ दोनच बल्ब सुरू असताना एवढं बिल कसं आलं असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश