शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

वीज विभागाचा कारनामा! दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला आलं तब्बल 26 लाखांचं बिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 10:33 IST

Farmer Got 26 Lakh Electricity Bill : शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही.

उन्नाव - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याच दरम्यान भरमसाठ विजेचं बिल आल्याची तक्रार अनेक लोकांनी केली आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये देखील घडली आहे. हजार, बाराशे नाही तर एका शेतकऱ्याला तब्बल 26 लाखांचं विजेचं बिल आल्याची अजब घटना समोर आली आहे. उन्नावमधील वीज विभागाच्या कारनाम्यांमुळे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करणाऱ्या शेतकऱ्याला भलं मोठं बिल आलं आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबाला धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गंगा घाट पोलीस स्टेशन परिसरातील बेहटा गावात राहणारे रामू राठोड यांच्या घरी 26 लाख रुपयांचं विजेचं बिल आलं. एवढं मोठं बिल पाहून शेतकरी रामू राठोड यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. तेव्हापासून शेतकरी वीज विभागाच्या फेऱ्या मारत आहे. मात्र कोणीही त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. रामू राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही आणि पाच मुलींचं लग्न करायचं आहे. मला 26 लाख रुपयांचं बिल कसं आलं हे काहीच कळत नाही. अधिकाऱ्यांना याबद्दल सांगितलं तर ते केवळ आश्वासनं देत आहेत, याकडे कोणीही गांभीर्याने पाहत नाही.

वीज विभागाचे अधिकारी उपेंद्र तिवारी यांना याबाबत विचारलं असता त्यांनी ही बाब आता आमच्या निदर्शनास आली. शेतकऱ्याचे वीज बिल तत्काळ बदलण्यात येईल असं म्हटलं आहे. तसेच तांत्रिक अडथळ्यामुळे त्याला 26 लाख रुपयांचं वीज बिल गेलं. कधी कधी मीटर 8 हजार, 80 हजार यूनिटमधून बिल जनरेट केला जातो. यानुसार आणखी वीज बिलांना तत्काळ योग्य करण्यात येईल असं देखील उपेंद्र यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील बलरामपूरमध्ये इलेक्ट्रीसिटी विभागाने शेतकऱ्याला तब्बल 64 लाखांचं बिल पाठवलं होतं. इतकचं नाही तर बिल भरलं नाही म्हणून शेतकऱ्याला नोटीसही पाठविली होती. 29 जुलै 2020 मध्ये शिवकुमार यांच्या पत्नी सुनीता देवीच्या नावावर तब्बल 64,02,507 रकमेची नोटीस आली होती. 8 ऑगस्टपर्यंत हे बिल जमा करण्याचे निर्देश त्यामध्ये देण्यात आले होते. ही नोटीस मिळताच शिवकुमारचे कुटुंबीय चिंतेत होते. आपली सर्व संपत्ती विकली तरी तो हे बिल भरू शकत नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं होतं. घरात केवळ दोनच बल्ब सुरू असताना एवढं बिल कसं आलं असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरीUttar Pradeshउत्तर प्रदेश