शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Unlock 2: ८० कोटी गरिबांना आणखी पाच महिने मोफत अन्नधान्य; पंतप्रधानांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 02:53 IST

सध्या गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबास एक किलो डाळ दिली जाते. हे अन्नधान्य वाटप दिवाळी आणि छटपूजेपर्यंत सुरु राहील, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे देशात पहिल्या ‘लॉकडाऊन’नंतर सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी पाच महिने राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. त्यानुसार देशातील ८० कोटी गरिबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य दिले जाईल.

सध्या गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबास एक किलो डाळ दिली जाते. हे अन्नधान्य वाटप दिवाळी आणि छटपूजेपर्यंत सुरु राहील, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी यांनी ही घोषणा केली. ‘लॉकडाऊन’च्या घोषणेपासून पंतप्रधानांचे हे चौथे भाषण केवळ १७ मिनिटांचे होते. त्यात ‘अनलॉक-२’च्या टप्प्यात अधिक सावध राहण्याची गरज व मोफत धान्यवाटपास मुदतवाढ याच दोन मुद्द्यांवर अधिक भर दिला. यावरून कोरोनाचे संकट बरेच महिने राहील व उभारी अर्थव्यवस्थेला येईपर्यंत कोट्यवधी रोजगार उपलब्ध होणार नाहीत, याचे केंद्र सरकारने दिलेले दिलेले हे अप्रत्यक्ष संकेत दिसत आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामुळे यापुढील काळात सर्वांनी अधिक सावध राहायला हवे, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, पावसाळ्यात कृषीक्षेत्रामध्ये जोरदार काम सुरु असते व अन्य क्षेत्रांमध्ये सुस्ती असते. पावसाळा व सणासुदीचा हंगाम संपला की इतर क्षेत्रांनाही उभारी येते. त्यामुळे मोफत अन्नयोजना नोव्हेंबरप़र्यंत राबविली जाईल. ''येत्या पाच महिन्यांत योजनेवर ९० हजार कोटी रुपये खर्च होतील. आधीच्या तीन महिन्यांचाही हिशेब केल्यास नोव्हेंबरपर्यंत दीड लाख कोटी रुपये खर्च होतील. जगातील ही सर्वात मोठी मोफत अन्नवाटप योजना असून, कोरोनाशी लढतानाही भारताने ती राबवावी याने सर्व जग अचंबित झाले आहे, असे ते म्हणाले. या योजनेखाली मोफत धान्य दिल्या जाणाऱ्या लोकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अडीचपट, ब्रिटनच्या लोकसंख्येच्या १२पट तर युरोपीय संघातील देशांच्या लोकसंख्येच्या दुप्पटीहून अधिक आहे, अशी तुलना त्यांनी केली.एक देश एक कार्ड हवेचही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी यासाठी ‘एक देश, एक रेशनकार्ड’ योजना राज्यांनी जोमाने व त्वरेने राबवावी. यामुळे रोजीरोटीसाठी वर्षाचा बराच काळ गाव सोडून अन्यत्र जाणाºया स्थलांतरित कुटुंबानाही कोणत्याही ठिकाणी धान्य सुलभपणे मिळू शकेल.कोरोनाविरुद्धची प्रतिबंधक लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा लशीकरण कसे केले जावे याची चतु:सुत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विषद केली उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी कोरोना लस विकसित करण्याच्या प्रयत्नांच्या प्रगतीचा तसेच लस उपलब्ध झाल्यावर लशीकरणासाठी काय तयारी करावी लागेल याचा समग्र आढावा घेतला.

त्यांनी सांगितलेली चतु:सूत्री अशी:

1) डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी या व अन्य कोरोना योद्ध्यांचे लशीकरण सर्वप्रथम केले जावे.2)‘कुठेही आणि प्रत्येकाचे’ या तत्वाने सर्वांचे लशीकरण करावे.3) लस किंमतीच्या दृष्टीने परवडणारी व सर्वत्र उपलब्ध व्हावी.4) उत्पादन ते लशीकरणापर्यंत सर्व टप्प्यांचे तंत्रज्ञानाच्या साह्याने नियंत्रण करण्यासाठी देखरेख ठेवावी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या