शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Unlock 2: ८० कोटी गरिबांना आणखी पाच महिने मोफत अन्नधान्य; पंतप्रधानांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 02:53 IST

सध्या गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबास एक किलो डाळ दिली जाते. हे अन्नधान्य वाटप दिवाळी आणि छटपूजेपर्यंत सुरु राहील, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे देशात पहिल्या ‘लॉकडाऊन’नंतर सुरु करण्यात आलेली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना आणखी पाच महिने राबविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केली. त्यानुसार देशातील ८० कोटी गरिबांना नोव्हेंबरपर्यंत मोफत अन्नधान्य दिले जाईल.

सध्या गरीब कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा पाच किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबास एक किलो डाळ दिली जाते. हे अन्नधान्य वाटप दिवाळी आणि छटपूजेपर्यंत सुरु राहील, असे पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मोदी यांनी ही घोषणा केली. ‘लॉकडाऊन’च्या घोषणेपासून पंतप्रधानांचे हे चौथे भाषण केवळ १७ मिनिटांचे होते. त्यात ‘अनलॉक-२’च्या टप्प्यात अधिक सावध राहण्याची गरज व मोफत धान्यवाटपास मुदतवाढ याच दोन मुद्द्यांवर अधिक भर दिला. यावरून कोरोनाचे संकट बरेच महिने राहील व उभारी अर्थव्यवस्थेला येईपर्यंत कोट्यवधी रोजगार उपलब्ध होणार नाहीत, याचे केंद्र सरकारने दिलेले दिलेले हे अप्रत्यक्ष संकेत दिसत आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यामुळे यापुढील काळात सर्वांनी अधिक सावध राहायला हवे, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, पावसाळ्यात कृषीक्षेत्रामध्ये जोरदार काम सुरु असते व अन्य क्षेत्रांमध्ये सुस्ती असते. पावसाळा व सणासुदीचा हंगाम संपला की इतर क्षेत्रांनाही उभारी येते. त्यामुळे मोफत अन्नयोजना नोव्हेंबरप़र्यंत राबविली जाईल. ''येत्या पाच महिन्यांत योजनेवर ९० हजार कोटी रुपये खर्च होतील. आधीच्या तीन महिन्यांचाही हिशेब केल्यास नोव्हेंबरपर्यंत दीड लाख कोटी रुपये खर्च होतील. जगातील ही सर्वात मोठी मोफत अन्नवाटप योजना असून, कोरोनाशी लढतानाही भारताने ती राबवावी याने सर्व जग अचंबित झाले आहे, असे ते म्हणाले. या योजनेखाली मोफत धान्य दिल्या जाणाऱ्या लोकांची संख्या अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अडीचपट, ब्रिटनच्या लोकसंख्येच्या १२पट तर युरोपीय संघातील देशांच्या लोकसंख्येच्या दुप्पटीहून अधिक आहे, अशी तुलना त्यांनी केली.एक देश एक कार्ड हवेचही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी यासाठी ‘एक देश, एक रेशनकार्ड’ योजना राज्यांनी जोमाने व त्वरेने राबवावी. यामुळे रोजीरोटीसाठी वर्षाचा बराच काळ गाव सोडून अन्यत्र जाणाºया स्थलांतरित कुटुंबानाही कोणत्याही ठिकाणी धान्य सुलभपणे मिळू शकेल.कोरोनाविरुद्धची प्रतिबंधक लस जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा लशीकरण कसे केले जावे याची चतु:सुत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विषद केली उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी कोरोना लस विकसित करण्याच्या प्रयत्नांच्या प्रगतीचा तसेच लस उपलब्ध झाल्यावर लशीकरणासाठी काय तयारी करावी लागेल याचा समग्र आढावा घेतला.

त्यांनी सांगितलेली चतु:सूत्री अशी:

1) डॉक्टर, नर्स व अन्य आरोग्य कर्मचारी या व अन्य कोरोना योद्ध्यांचे लशीकरण सर्वप्रथम केले जावे.2)‘कुठेही आणि प्रत्येकाचे’ या तत्वाने सर्वांचे लशीकरण करावे.3) लस किंमतीच्या दृष्टीने परवडणारी व सर्वत्र उपलब्ध व्हावी.4) उत्पादन ते लशीकरणापर्यंत सर्व टप्प्यांचे तंत्रज्ञानाच्या साह्याने नियंत्रण करण्यासाठी देखरेख ठेवावी

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या