शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

शेतकऱ्यांचा संप म्हणजे पब्लिसिटी स्टंट- केंद्रीय कृषिमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 16:34 IST

केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांचं असंवेदनशील विधान

पटना : एका बाजूला शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला बोगस म्हटलं जात आहे. पाटण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख 'पब्लिसिटी स्टंट' म्हणून केला आहे. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.देशातील शेतकरी कालपासून (1 जून) संपावर आहे. शेतकऱ्यांचा संप 10 जूनपर्यंत सुरू होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पाटण्यामध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राधा मोहन सिंग यांनी अतिशय संवेदनशील विधान केलं. 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी कामं करावी लागतात. देशात 12-14 कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत 1000-500 शेतकरी असतील आणि त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं,' असं धक्कादायक विधान सिंग यांनी केलं. भाजपा नेत्यांनी याआधीही शेतकऱ्यांबद्दल बेताल विधानं केली आहेत. शेतकरी आंदोलन हा काही मुद्दा नाही, असं विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं होतं. 'शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. ते उगाच नको त्या गोष्टी करुन स्वत:च नुकसान करत आहेत,' असं खट्टर म्हणाले होते.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपा