शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

शेतकऱ्यांचा संप म्हणजे पब्लिसिटी स्टंट- केंद्रीय कृषिमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 16:34 IST

केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांचं असंवेदनशील विधान

पटना : एका बाजूला शेतकरी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला असताना, दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली जात आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी त्यांच्या आंदोलनाला बोगस म्हटलं जात आहे. पाटण्यामध्ये एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा उल्लेख 'पब्लिसिटी स्टंट' म्हणून केला आहे. नवभारत टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.देशातील शेतकरी कालपासून (1 जून) संपावर आहे. शेतकऱ्यांचा संप 10 जूनपर्यंत सुरू होणार आहे. केंद्रातील मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पाटण्यामध्ये एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राधा मोहन सिंग यांनी अतिशय संवेदनशील विधान केलं. 'प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी कामं करावी लागतात. देशात 12-14 कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेत 1000-500 शेतकरी असतील आणि त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं,' असं धक्कादायक विधान सिंग यांनी केलं. भाजपा नेत्यांनी याआधीही शेतकऱ्यांबद्दल बेताल विधानं केली आहेत. शेतकरी आंदोलन हा काही मुद्दा नाही, असं विधान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केलं होतं. 'शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या नाहीत. ते उगाच नको त्या गोष्टी करुन स्वत:च नुकसान करत आहेत,' असं खट्टर म्हणाले होते.  

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपBJPभाजपा