शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

२०१९-२०२१ या तीन वर्षांत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या; सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:44 IST

देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नवी दिल्ली : देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून, २०१९ ते २०२१ या कालावधीत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. केंद्रीय मंत्री अब्बय्या नारायणस्वामी यांनी याबाबत संसदेत माहिती दिली. मात्र, देशात सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट झाली नाही.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री अब्बय्या नारायणस्वामी यांनी लोकसभेत सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले की, आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०,३३५ एवढी होती. हा आकडा २०२० मध्ये १२,५२६ वर पोहचला आणि २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याची नोंद आहे. अब्बय्या नारायणस्वामी यांनी मंगळवारी लोकसभेत सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

मृतांच्या संख्येत वाढ तसेच उच्च शिक्षण विभागाने देशभरातील संस्थांमध्ये समुपदेशन कक्ष आणि एससी-एसटी विद्यार्थी सेल, समान संधी सेल, विद्यार्थी तक्रार कक्ष यांसारख्या विविध यंत्रणा आणि संपर्क अधिकारी नेमले आहेत, असे सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी उचललेल्या पावलांवर केंद्रीय मंत्री नारायणस्वामी यांनी नमूद केले. आकडेवारीनुसार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढले आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये २१९१ मृतांची वाढ झाली तर २०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत मृतांच्या संख्येत ५६३ ने वाढ झाली. 

टॅग्स :ParliamentसंसदStudentविद्यार्थीDeathमृत्यू