शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

२०१९-२०२१ या तीन वर्षांत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांची आत्महत्या; सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:44 IST

देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.

नवी दिल्ली : देशात मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून, २०१९ ते २०२१ या कालावधीत तब्बल ३५ हजार विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. केंद्रीय मंत्री अब्बय्या नारायणस्वामी यांनी याबाबत संसदेत माहिती दिली. मात्र, देशात सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) विद्यार्थ्यांची संख्या स्पष्ट झाली नाही.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री अब्बय्या नारायणस्वामी यांनी लोकसभेत सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले की, आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १०,३३५ एवढी होती. हा आकडा २०२० मध्ये १२,५२६ वर पोहचला आणि २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असल्याची नोंद आहे. अब्बय्या नारायणस्वामी यांनी मंगळवारी लोकसभेत सामाजिक भेदभावामुळे आत्महत्या करणाऱ्या एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

मृतांच्या संख्येत वाढ तसेच उच्च शिक्षण विभागाने देशभरातील संस्थांमध्ये समुपदेशन कक्ष आणि एससी-एसटी विद्यार्थी सेल, समान संधी सेल, विद्यार्थी तक्रार कक्ष यांसारख्या विविध यंत्रणा आणि संपर्क अधिकारी नेमले आहेत, असे सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी उचललेल्या पावलांवर केंद्रीय मंत्री नारायणस्वामी यांनी नमूद केले. आकडेवारीनुसार, विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढले आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये २१९१ मृतांची वाढ झाली तर २०२१ मध्ये २०२० च्या तुलनेत मृतांच्या संख्येत ५६३ ने वाढ झाली. 

टॅग्स :ParliamentसंसदStudentविद्यार्थीDeathमृत्यू