शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
2
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
3
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
4
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
5
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
6
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
7
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
8
EXCLUSIVE: अजित पवार-शरद पवार दोघेही एकत्र भाजपसोबत आले तर काय...? CM फडणवीसांनी दिलं उत्तर
9
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
10
२३४ पैकी ५६ जागा अन् ३ मंत्रिपदाची मागणी, शाहांनी आखली रणनीती; तामिळनाडूत भाजपाचं गणित काय?
11
ठाकरे माझे मतदार! मत मागण्यासाठी मातोश्रीवर पोहोचला शिंदेसेनेचा उमेदवार, सारेच अवाक्, त्यानंतर घडलं असं काही? 
12
दुसऱ्याची चूक आणि करोडपती झाला ट्रेडर, ४० कोटी आले खात्यात, पण प्रकरण गेलं कोर्टात, अखेरीस...
13
"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
14
एक लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असता; अमेरिकेत दोन भारतीयांनी केला 'हा' मोठा गुन्हा
15
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
16
"डोनाल्ड ट्रम्प हिटलर बनलेत, संपूर्ण जगावर नियंत्रण मिळवायचंय, एक ना एक दिवस आपल्यालाही..."
17
Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच
18
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
19
२९ किलो सोनं, रोख रक्कम, DRI ने रॅकेटचा कार्यक्रम केला; कुठे झाली कारवाई, छाप्यात किती कोटी मिळाले?
20
Vijay Hazare Trophy Quarter Finals Full Schedule : मुंबईसह हे ८ संघ क्वार्टर फायनलमध्ये; इथं पाहा संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारची पावती फाटणार का?; नितीन गडकरी हसले आणि म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 14:47 IST

नवी दिल्ली/ मुंबईः  मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहीनीने केंद्रीयमंत्री नितिन गडकरी ...

ठळक मुद्देगडकरी म्हणाले, प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने चालत असते.यावेळी गडकरींना महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले.यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांसंदर्भातही चर्चा केली.

नवी दिल्ली/मुंबईः मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहीनीने केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यात, "महाराष्ट्रातील सरकार नियमाने चालत आहे का? त्याचीही पावती फाटण्याची वेळ आली आहे, असे वाटते का?" असा प्रश्न आला. यावर, गडकरी एकदम हसले आणि त्यांनी या प्रश्नाला मोकळेपणाने उत्तर दिले.

गडकरी म्हणाले, प्रत्येक सरकार आपापल्या पद्धतीने चालत असते. मला वाटते, की देश अत्यंत गंभीर संकटातून जात आहे. कोरोना संकटाशी लढाई सुरू आहे. विरोधकांचे कामच असते टीका करणे. देशासमोर आर्थिक संकट आहे. त्याच्याशीही लढाई सुरू आहे. सध्या देशातील गरीब, मजूर, शेतकरी अत्यंत दुःखी आहेत. अशा वेळी, सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकत्रित येऊन या सर्वांना कशापद्धतीने खूश करता येईल, या सर्वांच्या समस्यां कशा सोडवता येतील आणि परिस्थितीतून मार्ग कसा निघेल, यासाठी काम करायला हवे. काही दिवसांसाठी राजकारण थांबवावे. जेव्हा ही समस्या संपेल, तेव्हा लोकशाही आहे, ज्यांच्यात जेवढा जोर आहे, त्याने तसा प्रयत्न करावा. 

CoronaVirusEpidemic : कोरोनाचा सामना; अमेरिकेची अॅक्शन, जगात 'असा' घेरला जातोय चीन

यावेळी महाराष्ट्रातील राजकारणावर पुन्हा प्रश्न विचारला असता गडकरी म्हणाले, मी जास्तवेळ दिल्लीतच असतो. महाराष्ट्रात महाराष्ट्र आणि मुंबईत माझे फारसे जानेही नाही. सध्या माझे संपूर्ण लक्ष कोरोना संकटावर आहे. पंतप्रधानांनी मझ्यावर काही जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली आहे. केवळ त्यांच्याच संपर्कात मी असतो. बाकी राजकारणासंदर्भात मला माहीत नाही.

"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'

नारायण राणेंनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यांचा तुम्हाला फोन आला होता का? असे विचारले असता. हो आला होता. ते फार चांगले नेते आहेत. त्यांच्याशी माझे नेहमीच बोलने होत असते. ते महाराष्ट्रातील एक हुशार आणि अभ्यासू नेते आहेत, असे गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कामांसंदर्भातही चर्चा केली. 

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

आजतक या वृत्त वाहिनीने आयोजित केलेल्या 'e-अजेंडा' कार्यक्रमातील 'विकासाचा अग्निपथ' या सत्रात गडकरी सहभागी झाले होते.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईdelhiदिल्ली