शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 09:26 IST

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

Kiren Rijiju on Rahul Gandhi: केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर या वक्तव्याबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारल्याचा आणि भारत-चीन सीमा तणावावरील त्यांच्या टिप्पण्यांचा संदर्भ दिला. राहुल गांधी यांनी भारतीयांसारखे बोलावे, पण ते कोणाचेही ऐकत नाहीत, अगदी त्यांच्या पक्षाच्या लोकांचेही नाही, असं मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं. तसेच जेव्हा राहुल गांधी संसदेत बोलतात तेव्हा त्यांच्याच पक्षाचे खासदार अस्वस्थ होतात, असंही मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधींवर भारतविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून देश कमकुवत करत असल्याचा आरोप केला. निवडणुका हरल्यानंतर काँग्रेस संस्थांची बदनामी करते, असं रिजिजू म्हणाले. पंतप्रधान-मुख्यमंत्री अटक करण्याच्या विधेयकावर पंतप्रधान मोदींच्या भूमिकेसाठी आणि संसद रखडल्याबद्दल त्यांनी विरोधकांना जबाबदार धरले. कोणत्याही निवडणुकीत लोक राष्ट्रहितासाठी काम करणाऱ्यांना पाठिंबा देतात. राहुल गांधी हेडलाइन मिळवण्यासाठी विचित्र गोष्टी बोलतात. पण त्यांच्या या गोष्टी मतात बदलणार नाहीत. जर मी त्यांच्या जागी असतो तर मी सरकारला राष्ट्रीय हिताचे प्रश्न विचारले असते असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं.

"राहुल गांधी हे विरोधीपक्षाचे नेते आहेत आणि मला त्यांच्यावर टीका करायची नाही. पण जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना 'चोर' म्हटले, राफेलबाबत निरर्थक भाष्य केलं आणि चीनने आमची जमीन बळकावली असा दावा केला तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना फटकारले. त्यांनी भारतीयांसारखे बोलले पाहिजे. मी राहुल गांधींमध्ये सुधारणा करणारा नाही. कारण ते ऐकणारे नाहीत. जेव्हा जेव्हा राहुल गांधी काही बोलतात तेव्हा त्यांचे सर्व खासदार खूप अस्वस्थ होतात. त्यांना भीती असते की ते निरर्थक बोलतील आणि पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल. लोकशाहीत, विरोधी पक्ष मजबूत असला पाहिजे. ते विरोधी पक्षाची मूलभूत कर्तव्ये पार पाडू शकत नाहीत, एक मजबूत विरोधी पक्ष तर सोडाच," असं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले.

"राहुल गांधी अतिशय धोकादायक मार्गाने जात आहेत. जॉर्ज सोरोस यांनी भारत सरकार अस्थिर करण्यासाठी एक ट्रिलियन डॉलर्स ठेवले आहेत. कॅनडा, अमेरिका, ब्रिटन आणि अनेक डाव्या संघटनांशी संबंधित खलिस्तानी शक्ती भारताविरुद्ध कट रचत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस त्यांच्यासोबत उभे आहेत. हे खूप चिंताजनक आहे, पण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली कोणीही देश अस्थिर करू शकत नाही," असंही रिजिजू म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा