शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

CoronaVirus News : "बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल"; केंद्रीय मंत्र्याचा रुग्णांच्या नातेवाईकांना अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 12:37 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates And Gajendra Singh Shekhawat : कोरोना रुग्णांची भेट घेण्यासाठी गेलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांना अजब सल्ला दिला आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.  

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा हा तब्बल 1,76,36,307 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,23,144 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 2771 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,97,894 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोना रुग्णांची भेट घेण्यासाठी गेलेल्या एका केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाईकांना अजब सल्ला दिला आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला असून पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे.  

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat) यांनी कोरोना काळात एक अजब विधान केलं आहे. "बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल" असं म्हटलं आहे. शेखावत यांनी जोधपूर येथील एका रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान एका कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना "बालाजीला नारळ अर्पण करा, सर्व काही ठीक होईल" असा सल्ला दिला आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण झाला आहे. शेखावत यांनी राजस्थानमधील काही रुग्णालयांची पाहणी करण्यासाठी दौरे केले. याच दरम्यान जोधपूरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याने येथील रुग्णालयांना भेट दिली. 

रुग्णालयामध्ये शेखावत यांनी काही रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यावेळी दोन महिला प्रचंड रडत होत्या. त्यांनी यापुढे आमचं कसं होणार असा प्रश्न शेखावत यांना विचारला. त्यावर शेखावत यांनी देवावर विश्वास ठेवा तो सर्वकाही ठिक करेल, असं सांगितलं. तसेच "बालाजी महाराजाचं नामस्मरण करा, त्यांना नारळ वाहा सर्व काही ठीक होईल" असं शेखावत यांनी या मदत मागणाऱ्या महिलांना सांगितलं. या घटनेनंतर शेखावत यांनी ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. "डॉक्टर त्याचं काम करत आहेत. बालाजीवर श्रद्धा ठेवा आणि नारळ वाहा" असा सल्ला देण्यात काय चुकीचं आहे, असा प्रश्न शेखावत यांनी विचारला आहे. 

गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपण केलेलं वक्तव्य योग्यच असून रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना मानसिक आधार देणे हे चुकीचं आहे का? असं म्हटलं आहे. तसेच घाबरलेल्या रुग्णाच्या आईच्या मनाला शांती मिळावी म्हणून तिला आधार देणं. तसेच औषधांबरोबर प्रार्थनाही कामी येतील हे सांगायचं काम मी केलं. डॉक्टरांकडून मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात मला काहीही शंका नसून ते त्यांची जबाबदारी अत्यंत योग्य पद्धतीने पार पाडत आहेत असंही शेखावत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारणIndiaभारत