शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

''एक राष्ट्र, एक भाषा'' धोरणावर केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 20:57 IST

लोकसभेत या विषयावर आज पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली: देशाचे संविधान सर्व भाषांना समान मानत असल्याने एक राष्ट्र, एक भाषा हे धोरण लागू करण्याचा कोणताही विचार करत नसल्याची माहिती आज केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभेत या विषयावर आज पुन्हा चर्चा करण्यात आल्यानंतर याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हिंदी दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 'एक देश एक भाषा' या धोरणाला समर्थन केल्यामुळे यावरुन वाद निर्माण झाला होता. तसेच अनेक विरोधकांनी देखील या धोरणावर निशाणा साधला होता.

सर्वाधिक जास्त बोलली जाणारी हिंदी भाषा आज देशाला एकसंध बांधण्याचे काम करत आहे. संपूर्ण देशात एक भाषा होणे अत्यंत गरजेचे आहे. जी जगात भारताची ओळख बनेल, असे अमित शाह यांनी सांगितले होते. मात्र, 'एक देश एक भाषा' या धोरणाला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, पश्चिम बंगालाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि डीएमकेचे प्रमुख डीएमके स्टॅलिनसह अनेक नेत्यांनी विरोध दर्शविला होता.

एक राष्ट्र, एक भाषा या धोरणावर टीका झाल्यानंतर मी कोणत्याही प्रादेशिक भाषांवर हिंदी भाषा लादण्याचे वक्तव्य केले नाही. तसेच मी हिंदी भाषिक राज्यात राहत नाही, तर गुजरातला राहतो. मी फक्त मातृभाषेनंतर हिंदी भाषा शिकण्याचा आग्रह केला होता. त्याचप्रमाणे ज्या राजकीय नेत्यांना या विषयावर राजकारण करायचं आहे ते करु शकतात असं देखील त्यांनी विरोधकांना सांगितले होते. 

भाषा आपल्याला देशाची मोठी ताकद आहे. मात्र, देशाची एक भाषा गरजेची आहे, कारण विदेशी भाषांना स्थान मिळणार नाही. देशाची एक भाषा लक्षात घेऊन आपल्या पुर्वजांनी राजभाषेची कल्पना केली होती आणि राजभाषेच्या रुपाने हिंदी स्वीकारली होती. त्यामुळे हिंदी भाषेला प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे, असे हिंदी दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात अमित शाह यांनी वक्तव्य केलं होतं.

टॅग्स :Amit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकारBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी