शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 'ती' यादीच वाचली; काँग्रेसला करून दिली जुनी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 17:49 IST

संसदेत बजेटवरील चर्चेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले, यावेळी त्यांनी काँग्रेस राजवटीतील धोरणांचा उल्लेख करत विरोधकांवर टीका केली. 

नवी दिल्ली - मी काँग्रेसकडून आतापर्यंत केलेल्या सर्व बजेटवरील भाषणांना आव्हान देऊ शकते, काँग्रेस सरकार काळात कधी सर्व राज्यांची नावे बजेटमध्ये घेतली गेली?, बजेटबाबत विरोधकांकडून दुष्प्रचार केला जातोय हे माझ्यासाठी खूप दु:खद आहे. याआधीही बजेटमध्ये अनेक राज्यांचा उल्लेख केला नव्हता. २००९ च्या बजेटमध्ये केवळ २ राज्ये बिहार आणि उत्तर प्रदेश यांची नावे घेतली होती. बजेटमध्ये जर कुठल्या राज्याच्या नावाचा उल्लेख नसेल तर त्याला काहीही पैसे दिले नाहीत असा अर्थ होत नाही असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.

संसदेच्या अधिवेशनात आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांनी अर्थसंकल्पावर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, २००४-०५ च्या बजेटमध्ये १७ राज्यांची नावे घेतली नाहीत. मग त्या १७ राज्यांना पैसे दिले नव्हते का? २००५-०६ या बजेटमध्ये १८ राज्यांची नावे घेतली नाहीत. प्रत्येक वर्षीच्या बजेटमध्ये ज्या राज्यांची नावे घेतली नाहीत त्याचा उल्लेख करत सीतारामन यांनी काँग्रेसला सवाल केला. 

तसेच तेलंगणापासून पश्चिम बंगालपर्यंत, महाराष्ट्र, केरळ ज्या राज्यांच्या योजनांसाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली त्याची यादी अर्थमत्र्यांनी वाचून दाखवली. कुठल्या योजनेला किती निधी दिला हे सांगितले. त्रिशूर जिल्ह्यातील हायवे प्रोजेक्टसाठी ९७०० कोटी, दिल्ली अमृतसर कटरा रोड योजनेसाठी १८ हजार २७४ कोटी, विंझगम पोर्टसाठी ८१८ कोटी दिल्याचं अर्थमंत्र्यांनी भाषणात नमूद केले. 

स्वामिनाथन कमिटीच्या शिफारशीकडे यूपीए सरकारचं दुर्लक्ष

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की, कृषी आणि एमएसपीच्या गॅरंटीबाबत कमीत कमी २० जण बोलले, कृषी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी २०१३-१४ मध्ये २४ हजार ९०० कोटी निधी दिला मात्र आज हे वाढून १ लाख कोटींहून अधिक झाला आहे. ३ लाख २३ हजार कोटी शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीतून पैसे दिलेत. २०१४ साली १४ टक्के शेतकरी कर्ज घेत होते. आता ७६ टक्के शेतकरी अनुदानासह कर्ज घेत आहेत. शेतकऱ्यांना जी सुविधा मिळायला हवी त्यासाठी एक कमिटी काम करतेय. काँग्रेस आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांबाबत अनेकदा राजकारण करते. २००६ मध्ये स्वामिनाथन कमिटीनं ज्या शिफारशी केल्या होत्या त्याकडे दुर्लक्ष करण्याचं काम यूपीए सरकारने केले असा आरोप अर्थमंत्र्यांनी भाषणात केला.

"कर्नाटकात घोटाळे अन् इथे आम्हाला लेक्चर देताय"

 एससी-एसटी यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद सातत्याने वाढत आहे. महिलांच्या बजेटमध्ये गेल्यावेळच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. कर्नाटकात एससी-एसटी सबफंडातून पैसे काढले जातायेत त्याची माहिती नाही. कर्नाटकात एससीची अवस्था काय हे तुमच्या नेतृत्वाला विचारा. एससीविषयी बोलणाऱ्या नेत्यांनी आजच कर्नाटकात जावं तिथे विचारा महर्षी वाल्मिकी शेड्यूल्ड कास्ट सोसायटीत मोठा घोटाळा आहे. मुख्यमंत्री स्वत: उभे राहून अरे भैय्या १८९ कोटी नाही तर केवळ ८९ कोटी आहेत बोलतात, काय कॉन्फिडन्स आहे. तिथे घोटाळे करताय आणि इथं लेक्चर देताय असा टोला निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लगावला.

टॅग्स :nirmala sitharamanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBudgetअर्थसंकल्प 2024Parliamentसंसदlok sabhaलोकसभा