शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:31 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

नवी दिल्ली: लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. 

काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. मात्र याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. जग मंदीच्या संकटाचा सामना करत आहे. चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. जर्मनी, ब्रिटनची अर्थव्यवस्था संकटात आहे. पण आपल्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

यूपीए सरकारमध्ये आपण गरिबी हटवा असे ऐकायचो. ६ दशकांपासून ऐकत आहोत. पण गरिबी गेली का? असा सवाल उपस्थित करत गरिबी कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, असं निर्मला सीतारामन म्हणाले. तसेच गरिबी आणखी कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यूपीएच्या काळात वीज येईल म्हटलं जायचं आता वीज आलीय, गॅस कनेक्शन मिळेल आता मिळालं आहे. पीएम आवास घर बनेल म्हणायचे आता घर बनलेत. स्वस्त औषधे आणि स्वास्थ सुविधा मिळाल्या आहेत. तोंडी आश्वासने देऊन काँग्रेसनं जनतेला स्वप्न दाखवली पण आम्ही जनतेची स्वप्न साकार करतोय, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी सभागृहात दिली. 

दरम्यान, कृषीवर अनेक नेते बोलत होते. २०१४ मध्ये कृषी बजेट २१ हजार कोटी होते आज १ लाखाहून अधिक बजेट झालंय. संरक्षण खात्याला १९४१ कोटी होते आज १६ हजार कोटी बजेट झाले. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे २०१४ मध्ये कठीण होते. आता सहज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. आज ३ कोटीहून अधिक घरात पाणी पोहचले आहे. देशात नवे जलवाहतूक पर्याय सुरू झाले. ग्लोबल रॅकिंगमध्ये भारत १० व्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपा