शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:31 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

नवी दिल्ली: लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. 

काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. मात्र याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. जग मंदीच्या संकटाचा सामना करत आहे. चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. जर्मनी, ब्रिटनची अर्थव्यवस्था संकटात आहे. पण आपल्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

यूपीए सरकारमध्ये आपण गरिबी हटवा असे ऐकायचो. ६ दशकांपासून ऐकत आहोत. पण गरिबी गेली का? असा सवाल उपस्थित करत गरिबी कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, असं निर्मला सीतारामन म्हणाले. तसेच गरिबी आणखी कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यूपीएच्या काळात वीज येईल म्हटलं जायचं आता वीज आलीय, गॅस कनेक्शन मिळेल आता मिळालं आहे. पीएम आवास घर बनेल म्हणायचे आता घर बनलेत. स्वस्त औषधे आणि स्वास्थ सुविधा मिळाल्या आहेत. तोंडी आश्वासने देऊन काँग्रेसनं जनतेला स्वप्न दाखवली पण आम्ही जनतेची स्वप्न साकार करतोय, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी सभागृहात दिली. 

दरम्यान, कृषीवर अनेक नेते बोलत होते. २०१४ मध्ये कृषी बजेट २१ हजार कोटी होते आज १ लाखाहून अधिक बजेट झालंय. संरक्षण खात्याला १९४१ कोटी होते आज १६ हजार कोटी बजेट झाले. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे २०१४ मध्ये कठीण होते. आता सहज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. आज ३ कोटीहून अधिक घरात पाणी पोहचले आहे. देशात नवे जलवाहतूक पर्याय सुरू झाले. ग्लोबल रॅकिंगमध्ये भारत १० व्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपा