शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'काँग्रेसने लोकांना फक्त स्वप्न दाखवली, पण आम्ही ती साकार करतोय'; सीतारामन यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 13:31 IST

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली.

नवी दिल्ली: लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला. 

काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. मात्र याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. जग मंदीच्या संकटाचा सामना करत आहे. चीनची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. जर्मनी, ब्रिटनची अर्थव्यवस्था संकटात आहे. पण आपल्या सरकारने उचललेल्या पावलांमुळे आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

यूपीए सरकारमध्ये आपण गरिबी हटवा असे ऐकायचो. ६ दशकांपासून ऐकत आहोत. पण गरिबी गेली का? असा सवाल उपस्थित करत गरिबी कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो, असं निर्मला सीतारामन म्हणाले. तसेच गरिबी आणखी कमी करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यूपीएच्या काळात वीज येईल म्हटलं जायचं आता वीज आलीय, गॅस कनेक्शन मिळेल आता मिळालं आहे. पीएम आवास घर बनेल म्हणायचे आता घर बनलेत. स्वस्त औषधे आणि स्वास्थ सुविधा मिळाल्या आहेत. तोंडी आश्वासने देऊन काँग्रेसनं जनतेला स्वप्न दाखवली पण आम्ही जनतेची स्वप्न साकार करतोय, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी सभागृहात दिली. 

दरम्यान, कृषीवर अनेक नेते बोलत होते. २०१४ मध्ये कृषी बजेट २१ हजार कोटी होते आज १ लाखाहून अधिक बजेट झालंय. संरक्षण खात्याला १९४१ कोटी होते आज १६ हजार कोटी बजेट झाले. शेतकऱ्यांना कर्ज मिळणे २०१४ मध्ये कठीण होते. आता सहज शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. आज ३ कोटीहून अधिक घरात पाणी पोहचले आहे. देशात नवे जलवाहतूक पर्याय सुरू झाले. ग्लोबल रॅकिंगमध्ये भारत १० व्या क्रमांकावरून आता पाचव्या क्रमांकावर आला आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. 

टॅग्स :Monsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनParliamentसंसदNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनcongressकाँग्रेसBJPभाजपा