शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

भारतीय कंपन्यांना दरवर्षी आपल्या ताफ्यात ११० विमानं समाविष्ट करावी लागतील : ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:16 IST

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे.

Minister Jyotiraditya Scindia : नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर भारतीय कंपन्यांना त्यांच्या ताफ्यात दरवर्षी ११० ते १२० नवीन विमाने सामील करावी लागतील. विंग इंडिया २०२२ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. "कंपन्यांना अनेक नवीन जागतिक क्षेत्रांमध्ये उड्डाणास सुरुवात करायची असल्यास त्यांना त्यांच्या ताफ्यात मोठ्या आकाराची विमाने समाविष्ट करावी लागतील," असं ते यावेळी म्हणाले.

"पुढील वर्षापर्यंत देशांतर्गत प्रवाशांची संख्या दररोज ४.१० लाख प्रवासी इथपर्यंत पोहोचेल. २०२४-२५ पर्यंत प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर जाईल," अशी आशा ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. “भारताचे विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे. ना केवळ विमान कंपन्यांची संख्या वाढत आहे, तर विमानतळांची संख्याही वाढत आहे. अशातच कंपन्यांना आपल्या ताफ्यात नव्या विमानांचा समाविष्ट करणं आवश्यक असेल, असंही ते म्हणाले.

"२०१३-१४ मध्ये सर्व कंपन्यांकडे मिळून ४०० विमानं होती. परंतु गेल्या वर्षी ती वाढून ७१० झाली. सध्या भारतात ९ हजारांपेक्षा अधिक वैमानिक आहेत आणि यापैकी १५ टक्के महिला आहेत. ही संख्या जागतिक प्रमाणापेक्षा पाच टक्के अधिक आहे," असंही ते म्हणाले. भारताला पुढील २ दशकांमध्ये २२०० विमानांची गरज भासेल असं युरोपियन कंपनीला वाटत असल्याचं एअरबसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं गुरूवारी सांगितलं होतं.

प्रवाशांची संख्या वाढतेय"देशांतर्गत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३९ लाख होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ती घसरून ११ लाख झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांबद्दल सांगायचं झालं तर २०१८-१९ मध्ये ती सहा कोटी होती, परंतु कोरोनानंतर ती संख्या घसरून १ कोटी झाली," असंही शिंदे म्हणाले. २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यावर अन्य देशांशी पुन्हा जोडले जाऊ असंही ते म्हणाले.

टॅग्स :airplaneविमानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेIndiaभारत