शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

भारतीय कंपन्यांना दरवर्षी आपल्या ताफ्यात ११० विमानं समाविष्ट करावी लागतील : ज्योतिरादित्य शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 11:16 IST

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे.

Minister Jyotiraditya Scindia : नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर भारतीय कंपन्यांना त्यांच्या ताफ्यात दरवर्षी ११० ते १२० नवीन विमाने सामील करावी लागतील. विंग इंडिया २०२२ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. "कंपन्यांना अनेक नवीन जागतिक क्षेत्रांमध्ये उड्डाणास सुरुवात करायची असल्यास त्यांना त्यांच्या ताफ्यात मोठ्या आकाराची विमाने समाविष्ट करावी लागतील," असं ते यावेळी म्हणाले.

"पुढील वर्षापर्यंत देशांतर्गत प्रवाशांची संख्या दररोज ४.१० लाख प्रवासी इथपर्यंत पोहोचेल. २०२४-२५ पर्यंत प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर जाईल," अशी आशा ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. “भारताचे विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे. ना केवळ विमान कंपन्यांची संख्या वाढत आहे, तर विमानतळांची संख्याही वाढत आहे. अशातच कंपन्यांना आपल्या ताफ्यात नव्या विमानांचा समाविष्ट करणं आवश्यक असेल, असंही ते म्हणाले.

"२०१३-१४ मध्ये सर्व कंपन्यांकडे मिळून ४०० विमानं होती. परंतु गेल्या वर्षी ती वाढून ७१० झाली. सध्या भारतात ९ हजारांपेक्षा अधिक वैमानिक आहेत आणि यापैकी १५ टक्के महिला आहेत. ही संख्या जागतिक प्रमाणापेक्षा पाच टक्के अधिक आहे," असंही ते म्हणाले. भारताला पुढील २ दशकांमध्ये २२०० विमानांची गरज भासेल असं युरोपियन कंपनीला वाटत असल्याचं एअरबसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं गुरूवारी सांगितलं होतं.

प्रवाशांची संख्या वाढतेय"देशांतर्गत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३९ लाख होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ती घसरून ११ लाख झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांबद्दल सांगायचं झालं तर २०१८-१९ मध्ये ती सहा कोटी होती, परंतु कोरोनानंतर ती संख्या घसरून १ कोटी झाली," असंही शिंदे म्हणाले. २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यावर अन्य देशांशी पुन्हा जोडले जाऊ असंही ते म्हणाले.

टॅग्स :airplaneविमानJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेIndiaभारत