शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; जाणून घ्या, कोठे खर्च होणार 64 हजार कोटी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 15:44 IST

atmanirbhar swasth bharat yojana : या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 3,382 ब्लॉकमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेला (Atmanirbhar Swasth Bharat Yojana) केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली आहे. ही योजना जवळपास 64 हजार कोटी रुपयांची आहे. याबाबतची माहिती बुधवारी सूत्रांनी दिली आहे. या आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेअंतर्गत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि 3,382 ब्लॉकमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना केली जाईल.

आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेची घोषणा आर्थिक वर्ष 21-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सहा वर्षांच्या (आर्थिक वर्ष 25-26 पर्यंत) सुमारे 64,180 कोटी रुपयांच्या खर्चासह करण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे राष्ट्रीय आरोग्य अभियाना व्यतिरिक्त असणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये-1) हाय फोकस 10 राज्यांमध्ये 17,788 ग्रामीण आरोग्य आणि कल्याण केंद्रांसाठी सहाय्यता.2) सर्व राज्यांमध्ये 11,024 शहरी आरोग्य आणि कल्याण केंद्रांची स्थापना.3) सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची स्थापना आणि 11 हाय फोकस राज्यांमध्ये 3382 ब्लॉक सार्वजनिक आरोग्य युनिट्स.4) 602 जिल्हे आणि 12 केंद्रीय संस्थांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉकची स्थापना.5) नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी), त्याच्या 5 प्रादेशिक शाखा आणि 20 महानगर आरोग्य देखरेख युनिट्स मजबूत करणे.6) सर्व सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना जोडण्यासाठी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टलचा विस्तार.7) 17 नवीन सार्वजनिक आरोग्य युनिट्सचे संचालन आणि 33 विद्यमान सार्वजनिक आरोग्य युनिट्स मजबूत करणे, जे 32 विमानतळ, 11 बंदरे आणि 7 लँड क्रॉसिंगवर आहेत.8) 15 आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्रे आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची स्थापना.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCentral Governmentकेंद्र सरकार