शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: सोप्या शब्दांत बजेट 2022; लाखो नोकऱ्या ते LIC IPO पर्यंत, जाणून घ्या अर्थसंकल्पातील सर्वात महत्वाचे 15 मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:29 IST

जाणून घेऊयात, निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणातील सर्वात मोठे आणि महत्वाचे 15 मुद्दे...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 चा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावेळी त्या म्हणाल्या, हा अर्थसंकल्पाचा प्रामुख्याने महिला, शेतकरी, दलित आणि तरुणांना सर्वाधिक फायदा होणार आहे. तसेच, सर्वांचे कल्याण हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे, असेही सीतारामन म्हणाल्या. जाणून घेऊयात निर्मला सीतारामन यांच्या बजेट भाषणातील सर्वात मोठे आणि महत्वाचे 15 मुद्दे...

  1. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, लवकरच एलआयसीमध्ये आयपीओ आणला जाईल. याची प्रक्रिया याच आर्थिक वर्षात सुरू होईल. महत्वाचे म्हणजे, एलआयसीच्या आयपीओची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.
  2. आरोग्य विषयक पायाभूत सुविधा बळकट करणे, लसीकरण कार्यक्रमाला गती देणे आणि साथीच्या रोगाविरुद्ध मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करणे, हे आमचे लक्ष्य आहे.
  3. आत्मनिर्भर भारतच्या अनुषंगाने 60 लाख नव्या नोकर्या निर्माण करणे आणि पुढील पाच वर्षाच्या काळात 30 लाख इतर नोकऱ्या अथवा संधी निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल.
  4. अर्थसंकल्पात पुढील 25 वर्षांची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांसाठी 20 हजार कोटी रुपये देणार. लॉजिस्टिकचा खर्च कमी करणार. देशाची अर्थव्यवस्था 7 इंजिनच्या सहाय्याने धावेल.
  5. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाईल. शेतकऱ्यांकडून विक्रमी खरेदी केली जाईल. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देण्याचे काम केले जाईल. 2022-23 मध्ये 60 किमी लांबीचे रोपवे तयार केले जातील. भारतातील गरिबी हटवण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  6. सरकारने एमएसपीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात 2.37 कोटी रुपये पाठवले आहेत. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल. शासनाकडून रासायनिक व कीटकनाशक मुक्त शेतीचा प्रसार करण्यावर भर दिला जाईल.
  7. डिजिटल विद्यापीठे तयार केली जातील आणि शाळांमध्येही प्रत्येक वर्गांत स्मार्ट टीव्ही लावला जाईल. तरुणांना स्किल इंडिया मिशनच्या माध्यमाने आणि सरकारी योजनांतर्गत कुशल कामगार बनविण्यासाठी काम केले जाईल.
  8. पीएम आवास योजनेंतर्गत 48 हजार कोटी रुपये खर्चून 80 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नव्या घरांसाठी शहरी भागांत अधिक तरतूद केली जाईल आणि ग्रामीण भागासाठीही आधुनिक घरे बांधली जातील.
  9. आता पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाइन ट्रान्सफरची सुविधाही उपलब्ध होणार असून पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग सेवेअंतर्गत येईल. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 2022 पासून पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल बँकिंगवर काम केले जाईल. पोस्ट ऑफिसमध्ये एटीएम सुविधाही उपलब्ध होईल.
  10. 2022 मध्ये 5G सेवेची सुरू केली जाईल. हे तंत्रज्ञान भारतात उत्तम रोजगार निर्मिती करेल. देशातील दुर्गम भागांतही सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्व जण डिजिटल जगाशी जोडले जावे, हे आमचे लक्ष्य आहे.
  11. अर्थसंकल्पातील 25 टक्के रक्कम संरक्षण क्षेत्रातील संशोधनासाठी दिली जाणार आहे. देशाच्या सीमांवरील परिस्थिती लक्षात घेत या अर्थसंकल्पात संरक्षणावर अधिक भर देण्यात आला आहे.
  12. डिजिटल करन्सी लागू केली जाईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 2022-23 पासून डिजिटल चलनाची सुरू करणार आहे. यानंतर डिजिटल करन्सीचा व्यवहारात वापर होणे सुरू होईल.
  13. क्रिप्टो करन्सीच्या उत्पन्नावर 30% कर आकारला जाईल. तसेच, मार्च 2023 पर्यंत स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल. NPS वर कर सवलत वाढून 14 टक्के करण्यात आली आहे.
  14. सौरऊर्जा निर्मितीसाठी अर्थसंकल्पात 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्यात येणार आहेत. देशात सौरऊर्जेसाठी सौर पॅनेल आधारित ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यावर भर दिला जाईल.
  15. परदेशातून येणारी यंत्रसामग्री स्वस्त होईल आणि शेतीसाठी आवश्यक असलेली उपकरणेही स्वस्त होतील. कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होतील. हिऱ्यांच्या दागिन्यांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. तसेच छत्र्यांवरील आयात शुल्कात 20 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. 
टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प 2022BJPभाजपाLic IPOएलआयसी आयपीओ