शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

Union Budget 2019: देशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास जागतिक निकषांवर करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 02:48 IST

शातील १७ पर्यटनस्थळांचा विकास जागतिक निकषांवर करण्यात येणार असल्याचे विधान त्यांनी भाषणात केले; मात्र ही ठिकाणे कोणती यांचा उल्लेख त्यांनी टाळला.

नवी दिल्ली : निर्मला सीतारामन यांच्या पहिल्या अर्थसंकल्पातून पर्यटन विकासासाठी भरीव तरतूद होईल अशा अपेक्षेत असलेल्या या क्षेत्राची निराशा झाली आहे. देशातील १७ पर्यटनस्थळांचा विकास जागतिक निकषांवर करण्यात येणार असल्याचे विधान त्यांनी भाषणात केले; मात्र ही ठिकाणे कोणती यांचा उल्लेख त्यांनी टाळला.जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे विकसित करण्यामागे पर्यटकांना चांगला अनुभव मिळावा आणि त्यायोगे पर्यटकांच्या आगमनात लक्षणीय वाढ व्हावी, हाच उद्देश असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र त्याचबरोबर देशातील ५० हजार कारागिरांच्या आर्थिक हितसंबंधांना सामावून घेणारी संकुल योजना जाहीर करत त्यांनी आपल्या सरकारचा भर ईशान्येकडील राज्यांवर असेल असे संकेत दिले आहेत. मेघालय, सिक्कीम, अरुणाचल अशी ईशान्येकडील अनेक राज्ये पर्यटन नकाशावर आलेली असून तेथे जाणाऱ्या पाहुण्यांवरील निर्बंध केंद्र सरकारने हटविल्यानंतर तर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीआहे.केंद्राकडून आपल्याला भरीव करसवलती मिळाव्यात तसेच सुखद पर्यटनाच्या अनुभवासाठी जागतिक दर्जाच्या साधनसुविधांची व्यवस्था हवी, अशी मागणी या क्षेत्रातून होत होती. विशेषत: जिथे विदेशी पर्यटकांची मोठी वर्दळ असते, अशा ठिकाणांच्या प्रवासाच्या सुविधांवर केंद्राने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेने अर्थमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली होती.केंद्राच्या ‘उडान’ योजनेचा विस्तार खासगी पर्यटन क्षेत्राच्या विकासाला लाभदायी ठरेल, असा दावा या निवेदनात होता. हॉटेल व्यवसायाला सुलभ अटींवर कर्जपुरवठा करणे, जीएसटी प्रणाली सुटसुटीत करणे अशाही काही मागण्या होत्या; मात्र त्यांची विशेष दखल अर्थसंकल्पात घेण्यात आलेली नाही.नव्या घोषणा- देशाच्या पर्यटन नकाशावर अग्रस्थानी असलेल्या केरळ, गोवा आणि राजस्थान या राज्यांना मात्र सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातून थेट असे काहीच मिळालेले नाही.- ९ टक्के वाटा पर्यटन उद्योगाचा देशाच्या सकल घरेलू उत्पादनातला असून रोजगाराबरोबरच परकीय चलनाच्या कमाईचा तो महत्त्वाचा स्रोत मानला जातो.- ईशान्येकडील राज्यांवर लक्ष केंद्रित करून, सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्याचा सरकारचा मानस असू शकतो अशी शक्यता या क्षेत्रातले जाणकार व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019tourismपर्यटन