शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:56 IST

Turkey : भूकंपाच्या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे. तसेच तुर्की पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे.

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीसोबत मिळून तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक मंचावर तुर्की पाकिस्तानची बाजू घेत भारतविरोधी प्रॉपेगेंडा चालवणाऱ्यांसोबत उभा राहत आहे. भूकंपाच्या संकटकाळात भारताने केलेली मदत विसरून संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर पाकिस्तान आणि ओआयसीच्या सुरात सूर मिसळत तुर्कीने भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं सांगितलं. 

दरम्यान, तुर्कीने घेतलेल्या या भूमिकेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. मात्र भारतानेही संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. यूएनएचआरसीमध्ये भारताच्या प्रतिनिधी सीमा पुंजानी यांनी सांगितले की, सर्वसामान्यांचं जीवन, त्यांची उपजीविका आणि स्वातंत्र्यांच्या मुद्द्यांवरून झगडत असलेल्या पाकिस्तानच्या भारताविरोधात उभ्या राहण्यामुळे त्यांच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांचा उलगडा होत आहेत मी पाकिस्तानचं नेतृत्व आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगेन की, त्यांनी निराधार प्रॉपेगेंडा चालवण्याऐवजी सर्वसामान्यांच्या हितांसाठी आपली शक्ती खर्च करावी.

पुंजानी यांनी तुर्कीच्या भूमिकेबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आम्ही भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबत तुर्कीने केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झालं आहे. माझा सल्ला आहे की, आमच्या अंतर्गत प्रश्नांवर विनाकारण टिप्पण्या करणं तुर्कीनं टाळलं पाहिजे. त्यांनी सांगितले की, ओआयसीने जम्मू काश्मीरबाबत केलेले वाह्यात वक्तव्य आम्ही फेटाळून लावतो.  

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान