शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

कृतघ्न! भूकंपाच्या संकटात केलेल्या मदतीचा तुर्कीला विसर, ओकली भारताविरोधात गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 14:56 IST

Turkey : भूकंपाच्या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी तुर्कीमध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली होती. या संकटकाळात भारताने पुढाकार घेऊन तुर्कीला मोठ्या प्रमाणावर मदत दिली होती. मात्र भारताने केलेल्या मदतीचा अवघ्या काही दिवसांतच तुर्कीला विसर पडल्याचे चित्र आहे. तसेच तुर्की पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे.

इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीसोबत मिळून तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतली आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या जागतिक मंचावर तुर्की पाकिस्तानची बाजू घेत भारतविरोधी प्रॉपेगेंडा चालवणाऱ्यांसोबत उभा राहत आहे. भूकंपाच्या संकटकाळात भारताने केलेली मदत विसरून संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर पाकिस्तान आणि ओआयसीच्या सुरात सूर मिसळत तुर्कीने भारत जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन करत असल्याचं सांगितलं. 

दरम्यान, तुर्कीने घेतलेल्या या भूमिकेमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे. मात्र भारतानेही संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये मांडण्यात आलेल्या जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. यूएनएचआरसीमध्ये भारताच्या प्रतिनिधी सीमा पुंजानी यांनी सांगितले की, सर्वसामान्यांचं जीवन, त्यांची उपजीविका आणि स्वातंत्र्यांच्या मुद्द्यांवरून झगडत असलेल्या पाकिस्तानच्या भारताविरोधात उभ्या राहण्यामुळे त्यांच्या चुकीच्या प्राधान्यक्रमांचा उलगडा होत आहेत मी पाकिस्तानचं नेतृत्व आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगेन की, त्यांनी निराधार प्रॉपेगेंडा चालवण्याऐवजी सर्वसामान्यांच्या हितांसाठी आपली शक्ती खर्च करावी.

पुंजानी यांनी तुर्कीच्या भूमिकेबाबतही चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, आम्ही भारताच्या अंतर्गत प्रश्नाबाबत तुर्कीने केलेल्या वक्तव्यामुळे दु:ख झालं आहे. माझा सल्ला आहे की, आमच्या अंतर्गत प्रश्नांवर विनाकारण टिप्पण्या करणं तुर्कीनं टाळलं पाहिजे. त्यांनी सांगितले की, ओआयसीने जम्मू काश्मीरबाबत केलेले वाह्यात वक्तव्य आम्ही फेटाळून लावतो.  

टॅग्स :IndiaभारतJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान