शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

देशात बेरोजगारी घटली, रोजगार वाढले; १० वर्षांत १७.१ कोटी नव्या नोकऱ्या, २०२४ मध्ये..., केंद्र सरकारचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:15 IST

Central Government News: देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात असतानाच विरोधकांचे आरोप खोडून काढणारी आकडेवारी केंद्र सरकारने समोर आणली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये देशात नोकऱ्यांची संख्या वेगाने वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात असतानाच विरोधकांचे आरोप खोडून काढणारी आकडेवारी केंद्र सरकारने समोर आणली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये देशात नोकऱ्यांची संख्या वेगाने वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात देशामध्ये १७,.१ नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे २०२४ मध्ये ४.६ कोटी लोकांना रोजगार मिळाला, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देशामधील बेरोजगारीच्या दरात कमालीची घट झाली असून, महिलांना नोकऱ्या मिळण्याच्या प्रमाणात लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मनसूख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार देशामधील बेरोजगारीचा दर २०१७-१८ मधील ६ टक्क्यांवरून घटून २०२३-२४ मध्ये ३.२ एवढा कमी झाला आहे. तर महिलांच्या रोजगाराचे प्रमाण २२ टक्क्यांवरून वाढून ४०.३ टक्के झालं आहे.

कामगारमंत्र्यांनी सांगितले की, सरकारच्या नव्या धोरणामुळे देशातील श्रमशक्ती भक्कम झाली आहे. त्याबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांमुळे लोकांचं जीवनमान उंचावलं आहे. आयएलओच्या वर्ल्ड सिक्युरिटी रिपोक्ट २०२४-२६ नुसार भारतामध्ये सामाजिक सुरक्षा कव्हरेज दुप्पट झालं आहे. म्हणजेच ते २४.४ टक्क्यांनी वाढून ४८.८ टक्के एवढं झालं आहे. त्याबरोबरच ई-श्रम पोर्टलवर ३०.६७ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे. कामगारांच्या मदतीसाठी १० नवी ईएसआयसी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच १० नवीन कॉलेज बांधण्याची योजना आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :IndiaभारतjobनोकरीEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार