शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

देशात बेरोजगारी घटली, रोजगार वाढले; १० वर्षांत १७.१ कोटी नव्या नोकऱ्या, २०२४ मध्ये..., केंद्र सरकारचा दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 21:15 IST

Central Government News: देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात असतानाच विरोधकांचे आरोप खोडून काढणारी आकडेवारी केंद्र सरकारने समोर आणली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये देशात नोकऱ्यांची संख्या वेगाने वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.

देशात बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात असतानाच विरोधकांचे आरोप खोडून काढणारी आकडेवारी केंद्र सरकारने समोर आणली आहे. मागच्या दहा वर्षांमध्ये देशात नोकऱ्यांची संख्या वेगाने वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या काळात देशामध्ये १७,.१ नव्या नोकऱ्यांची निर्मिती झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे २०२४ मध्ये ४.६ कोटी लोकांना रोजगार मिळाला, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.

केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे देशामधील बेरोजगारीच्या दरात कमालीची घट झाली असून, महिलांना नोकऱ्या मिळण्याच्या प्रमाणात लक्षणीय अशी वाढ झाली आहे. मनसूख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार देशामधील बेरोजगारीचा दर २०१७-१८ मधील ६ टक्क्यांवरून घटून २०२३-२४ मध्ये ३.२ एवढा कमी झाला आहे. तर महिलांच्या रोजगाराचे प्रमाण २२ टक्क्यांवरून वाढून ४०.३ टक्के झालं आहे.

कामगारमंत्र्यांनी सांगितले की, सरकारच्या नव्या धोरणामुळे देशातील श्रमशक्ती भक्कम झाली आहे. त्याबरोबरच सामाजिक सुरक्षा योजनांमुळे लोकांचं जीवनमान उंचावलं आहे. आयएलओच्या वर्ल्ड सिक्युरिटी रिपोक्ट २०२४-२६ नुसार भारतामध्ये सामाजिक सुरक्षा कव्हरेज दुप्पट झालं आहे. म्हणजेच ते २४.४ टक्क्यांनी वाढून ४८.८ टक्के एवढं झालं आहे. त्याबरोबरच ई-श्रम पोर्टलवर ३०.६७ कोटी असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे. कामगारांच्या मदतीसाठी १० नवी ईएसआयसी मेडिकल कॉलेज मंजूर करण्यात आले आहेत. तसेच १० नवीन कॉलेज बांधण्याची योजना आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :IndiaभारतjobनोकरीEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार