सामाजिक संस्थांच्या जागावाटपाचा प्रश्न अधांतरीच
By Admin | Updated: July 15, 2015 00:15 IST2015-07-15T00:15:01+5:302015-07-15T00:15:01+5:30
नाशिक : गेल्या सात तेआठ दिवसांपासून स्थानिक वर्तमानपत्रात साधू व साध्वी यांच्या साधुग्राममध्ये जागावाटपाबाबत सातत्याने माहिती येत आहे. वस्तुत: साधुग्राममध्ये सामाजिक कामकाज करणार्या स्वयंसेवी संस्थांना जागावाटपाचा अद्यापही निर्णय झालेला नाही. तो निर्णय तत्काळ घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघांचे डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे.

सामाजिक संस्थांच्या जागावाटपाचा प्रश्न अधांतरीच
न शिक : गेल्या सात तेआठ दिवसांपासून स्थानिक वर्तमानपत्रात साधू व साध्वी यांच्या साधुग्राममध्ये जागावाटपाबाबत सातत्याने माहिती येत आहे. वस्तुत: साधुग्राममध्ये सामाजिक कामकाज करणार्या स्वयंसेवी संस्थांना जागावाटपाचा अद्यापही निर्णय झालेला नाही. तो निर्णय तत्काळ घेण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघांचे डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम सायखेडकर नाट्यगृहात झालेल्या बैठकीत ज्या सामाजिक संस्था प्रशासनाला विविध उपक्रमाद्वारे मदत करणार आहेत. त्यांनी प्रशासनाकडे अर्ज करावे, असे सांगितले होते. प्रत्यक्षात अर्ज देऊनही याबाबत कारवाई झालेली नाही. मेळा अधिकारी, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त हे केवळ साधुग्रामवर लक्ष केंद्रित करीत असून, चांगल्या काम करणार्या संस्थांना जागा देण्याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीत. या संस्था वर्तमानपत्रातून त्यांचे नियोजन काय करत आहे. हे जाहीर करीत आहेत. प्रत्यक्षात या संस्थांना प्रशासनाची परवानगी असणे आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक संस्थांना जागावाटपाबाबतचा निर्णय लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी डॉ. गिरीश मोहिते यांनी केली आहे. (प्रतिनिधी)