शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 15:59 IST

जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत.

UN Reports On Marriage: दरवर्षी भारतात लाखो तरुणी विवाहबंधनात अडकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेकींचे कमी वयात लग्न होते. एका आकडेवारीनुसार, भारतात 20 कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील तरुणी आहेत.

सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट 2024 नुसार, प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होते, तर 25 वर्षापूर्वी लग्न करणाऱ्यांची संख्या चारपैकी एक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून गेल्या काही वर्षांत 68 कोटी बालविवाह रोखण्यात आले आहेत.

स्त्री-पुरुष समानतेत जग मागे पडले एवढ्या प्रगतीनंतरही लिंग समानतेत जग मागे पडल्याची खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महिलांना अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्याची परिस्थिती पाहता स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी 176 वर्षे लागतील.

जगभरातील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेल्या 169 उद्दिष्टांपैकी 2030 पर्यंत केवळ 17 टक्के उद्दिष्टे साध्य होतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2015 मध्ये जगभरातील नेत्यांनी जी उद्दिष्टे निश्चित केली होती, ती गरिबी संपवणे, स्त्री-पुरुष समानता मिळवणे आणि अशा अनेक समस्या सोडवणे होते, परंतु या उद्दिष्टांकडे आपली वाटचाल थांबली आहे.

प्रयत्न अधिक तीव्र करणे आवश्यक संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार, हा अहवाल पाहता, 2030 पर्यंत अजेंडा पूर्ण होईल, परंतु त्यासाठी आपल्या प्रयत्नांना आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :marriageलग्नunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत