शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

भारतातील 20 कोटी मुलींचा बालविवाह; संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 15:59 IST

जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील आहेत.

UN Reports On Marriage: दरवर्षी भारतात लाखो तरुणी विवाहबंधनात अडकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील अनेकींचे कमी वयात लग्न होते. एका आकडेवारीनुसार, भारतात 20 कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. जगभरात 6.4 कोटी तरुणी आणि महिलांचे 18 वर्षांच्या होण्याआधीच लग्न केले जाते, यापैकी एक तृतीयांश भारतातील तरुणी आहेत.

सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स रिपोर्ट 2024 नुसार, प्रत्येक पाच मुलींपैकी एका मुलीचे 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न होते, तर 25 वर्षापूर्वी लग्न करणाऱ्यांची संख्या चारपैकी एक आहे. अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असून गेल्या काही वर्षांत 68 कोटी बालविवाह रोखण्यात आले आहेत.

स्त्री-पुरुष समानतेत जग मागे पडले एवढ्या प्रगतीनंतरही लिंग समानतेत जग मागे पडल्याची खंत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अनेक महिलांना अजूनही लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या अभावासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सध्याची परिस्थिती पाहता स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी 176 वर्षे लागतील.

जगभरातील परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी निर्धारित केलेल्या 169 उद्दिष्टांपैकी 2030 पर्यंत केवळ 17 टक्के उद्दिष्टे साध्य होतील, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2015 मध्ये जगभरातील नेत्यांनी जी उद्दिष्टे निश्चित केली होती, ती गरिबी संपवणे, स्त्री-पुरुष समानता मिळवणे आणि अशा अनेक समस्या सोडवणे होते, परंतु या उद्दिष्टांकडे आपली वाटचाल थांबली आहे.

प्रयत्न अधिक तीव्र करणे आवश्यक संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या म्हणण्यानुसार, हा अहवाल पाहता, 2030 पर्यंत अजेंडा पूर्ण होईल, परंतु त्यासाठी आपल्या प्रयत्नांना आणखी मजबूत करणे आवश्यक आहे. 

टॅग्स :marriageलग्नunited nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत