शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षा घेण्यावर ‘यूजीसी’ ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:31 IST

प्रतिज्ञापत्र : निर्णयाचे सुप्रीम कोर्टात केले समर्थन

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशातील सर्व विद्यापीठांनी त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा येत्या सप्टेंबरपर्यंत उरकाव्यात, या ६ जुलै रोजी जारी केलेल्या निर्देशांवर विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) ठाम असून, या निर्णयाचे जोरदार समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केले आहे.

आयोगाच्या या निर्णयाच्या विरोधात एकूण तीन याचिका दाखल केल्या गेल्या आहेत. देशभरातील विविध विद्यापीठांमधील ३१ विद्यार्थी, युवा सेनेचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे, तसेच अंतिम वर्षाचा एक विद्यार्थी कृष्णा वाघमारे यांनी या याचिका केल्या आहेत. देशातील कोरोनाची साथ अद्याप ओसरलेली नसताना परीक्षा घेण्याची सक्ती करणे हे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळे ‘यूजीसी’चे हे निर्देश रद्द करावेत, अशी त्यांची विनंती आहे.

याचिकांच्या उत्तरादाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आयोग म्हणतो की, कोराना साथीसह सर्व आनुषंगिक बाबींचा साकल्याने विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. आयोग म्हणतो की, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षांचे स्वरूप आणि वेळ ठरविण्याचे विद्यापीठांना पुरेसे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. विद्यापीठे या परीक्षा आॅनलाईन, आॅफलाईन किंवा या दोन्ही पद्धतींच्या मिश्रणानेही घेऊ शकतात. शिवाय जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र परीक्षा घ्यावी, असेही विद्यापीठांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात घालून परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांवर व परीक्षा घेण्याची विद्यापीठांवर सक्ती केली जात आहे, हे म्हणणे बरोबर नाही. ‘सीबीएसई’ व ‘आयसीएसई’ या केंद्रीय परीक्षा मंडळांनी स्वीकारलेले सूत्र विद्यापीठांनीही स्वीकारावे व आधीच्या वर्षांच्या परीक्षांमधील कामगिरीच्या आधारे विद्यार्थ्यांना पदवी द्यावी, या याचिकाकर्त्यांच्या सूचनेस विरोध करताना आयोग म्हणतो की, अंतिम पदवी परीक्षा व माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा यांची तुलना केली जाऊ शकत नाही. अध्ययन ही वर्धिष्णू प्रक्रिया असते व विद्यार्थ्याने किती ज्ञान संपादन केले आहे, याचे मूल्यमापन फक्त परीक्षेतच केले जाऊ शकते. शिवाय पदवीचा विद्यार्थ्याच्या नोकरी-व्यवसायातील संधीशी व आयुष्यातील भावी प्रगतीशी घनिष्ठ संबंध असल्याने पदवी ही विश्वासार्ह पद्धतीनेच दिली जायला हवी.राज्यांना अधिकार नाहीमहाराष्ट्र व दिल्ली सरकारांनी त्यांच्या क्षेत्रातील विद्यापीठांना पदवी परीक्षा न घेण्याचा आदेश दिला आहे; परंतु ‘यूजीसी’ म्हणते की, राज्यांना असा अधिकार नाही. कारण पदवी परीक्षा हा थेट शिक्षणाच्या दर्जाशी संबंधित विषय आहे व यासंबंधीचे अधिकार राज्यघटनेने फक्त केंद्र सरकारला दिलेले आहेत.केंद्र सरकारच्या वतीने आयोगाने हा निर्णय घेतला असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही त्यास मंजुरी दिली आहे. शिवाय हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्यात न्यायालयही हस्तक्षेप करू शकत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय