शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:44 IST

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील."

UG NEET Paper Leak : NEET UG आणि UGC NET परीक्षांचा मुद्दा देशभर गाजतोय. या परीक्षांचे पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. "सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, NEET परीक्षेनंतर आता UGC NET परीक्षेतही हेराफेरी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळेच परीक्षेच्या एका दिवसानंतर ही परीक्षा रद्द केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवले, पण पेपरफुटी थांबवता आली नाहीराहुल पुढे म्हणतात, "शिक्षण व्यवस्थेची अवस्था नोटाबंदीसारखी झाली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडून गेलीये. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जाते, पण ते भारतात सुरू असलेली पेपर लीक थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत. एका परीक्षेत अनियमितता आढळून आल्यावर ती रद्द केली, आता दुसरी रद्द होईल की नाही माहीत नाही. यासाठी दोषींना पकडलेच पाहिजे," असे राहुल म्हणाले. 

शिक्षण व्यवस्थेवर भाजपचे नियंत्रण"भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतेय. संपूर्ण शिक्षण व्यवस्था भाजप आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांनी काबीज केल्या आहेत. हे लोक प्रत्येक पदावर आपलेच लोक नियुक्त करतात. आपल्याला ही व्यवस्था बदलून लावायची आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणा नव्याने तयार करावी लागेल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. सरकारवर दबाव आणून या दोन्ही गोष्टी मार्गी लावण्याचा विरोधक प्रयत्न करतील. हे सरकार मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळले जात आहे," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पेपरफुटी ही देशविरोधी कृत्यपत्रकार परिषदेत राहुल यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "यात्रेदरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता देशात NEET आणि NET चे पेपर लीक झाले आहेत. पेपरफुटी राष्ट्रविरोधी कृती आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना संधी खूप कमी आहेत. तरुणांना पुढे जाण्याचा मार्ग नाही. हे एक गंभीर राष्ट्रीय संकट आहे. त्यामुळे पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यांना पकडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा