शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:44 IST

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील."

UG NEET Paper Leak : NEET UG आणि UGC NET परीक्षांचा मुद्दा देशभर गाजतोय. या परीक्षांचे पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. "सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, NEET परीक्षेनंतर आता UGC NET परीक्षेतही हेराफेरी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळेच परीक्षेच्या एका दिवसानंतर ही परीक्षा रद्द केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवले, पण पेपरफुटी थांबवता आली नाहीराहुल पुढे म्हणतात, "शिक्षण व्यवस्थेची अवस्था नोटाबंदीसारखी झाली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडून गेलीये. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जाते, पण ते भारतात सुरू असलेली पेपर लीक थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत. एका परीक्षेत अनियमितता आढळून आल्यावर ती रद्द केली, आता दुसरी रद्द होईल की नाही माहीत नाही. यासाठी दोषींना पकडलेच पाहिजे," असे राहुल म्हणाले. 

शिक्षण व्यवस्थेवर भाजपचे नियंत्रण"भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतेय. संपूर्ण शिक्षण व्यवस्था भाजप आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांनी काबीज केल्या आहेत. हे लोक प्रत्येक पदावर आपलेच लोक नियुक्त करतात. आपल्याला ही व्यवस्था बदलून लावायची आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणा नव्याने तयार करावी लागेल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. सरकारवर दबाव आणून या दोन्ही गोष्टी मार्गी लावण्याचा विरोधक प्रयत्न करतील. हे सरकार मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळले जात आहे," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पेपरफुटी ही देशविरोधी कृत्यपत्रकार परिषदेत राहुल यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "यात्रेदरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता देशात NEET आणि NET चे पेपर लीक झाले आहेत. पेपरफुटी राष्ट्रविरोधी कृती आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना संधी खूप कमी आहेत. तरुणांना पुढे जाण्याचा मार्ग नाही. हे एक गंभीर राष्ट्रीय संकट आहे. त्यामुळे पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यांना पकडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा