शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

"PM मोदींनी युद्ध थांबवले, पण देशातील पेपरफुटी थांबवू शकले नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:44 IST

"सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील."

UG NEET Paper Leak : NEET UG आणि UGC NET परीक्षांचा मुद्दा देशभर गाजतोय. या परीक्षांचे पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. "सर्व शैक्षणिक संस्था भाजपच्या ताब्यात आहेत. जोपर्यंत त्यांची सुटका होत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील," अशी टीका राहुल गांधी यांनी केली. दरम्यान, NEET परीक्षेनंतर आता UGC NET परीक्षेतही हेराफेरी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळेच परीक्षेच्या एका दिवसानंतर ही परीक्षा रद्द केली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध थांबवले, पण पेपरफुटी थांबवता आली नाहीराहुल पुढे म्हणतात, "शिक्षण व्यवस्थेची अवस्था नोटाबंदीसारखी झाली आहे. संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच कोलमडून गेलीये. हा मुद्दा आम्ही संसदेत मांडू. नरेंद्र मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवल्याचे बोलले जाते, पण ते भारतात सुरू असलेली पेपर लीक थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत. एका परीक्षेत अनियमितता आढळून आल्यावर ती रद्द केली, आता दुसरी रद्द होईल की नाही माहीत नाही. यासाठी दोषींना पकडलेच पाहिजे," असे राहुल म्हणाले. 

शिक्षण व्यवस्थेवर भाजपचे नियंत्रण"भाजप सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतेय. संपूर्ण शिक्षण व्यवस्था भाजप आणि त्यांच्या संघटनेच्या लोकांनी काबीज केल्या आहेत. हे लोक प्रत्येक पदावर आपलेच लोक नियुक्त करतात. आपल्याला ही व्यवस्था बदलून लावायची आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी यंत्रणा नव्याने तयार करावी लागेल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. सरकारवर दबाव आणून या दोन्ही गोष्टी मार्गी लावण्याचा विरोधक प्रयत्न करतील. हे सरकार मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा संपूर्ण देशात पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. तरुणांच्या भवितव्याशी खेळले जात आहे," असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

पेपरफुटी ही देशविरोधी कृत्यपत्रकार परिषदेत राहुल यांनी काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चाही उल्लेख केला. ते म्हणाले की, "यात्रेदरम्यान हजारो विद्यार्थ्यांनी पेपरफुटीच्या तक्रारी केल्या होत्या. आता देशात NEET आणि NET चे पेपर लीक झाले आहेत. पेपरफुटी राष्ट्रविरोधी कृती आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना संधी खूप कमी आहेत. तरुणांना पुढे जाण्याचा मार्ग नाही. हे एक गंभीर राष्ट्रीय संकट आहे. त्यामुळे पेपरफुटीला जबाबदार असणाऱ्यांना पकडले पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालexamपरीक्षाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा