शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

"जे बोंबलत फिरत होते त्यांना आता..."; भाजपच्या 'सौगात-ए-मोदी' वरुन ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:19 IST

'सौगात-ए-मोदी'च्या किट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray on Saugat-e-Modi: केंद्रातील भाजप सरकारने अल्पसंख्याकांच्या मदतीसाठी 'सौगत-ए-मोदी' नावाने एक नवीन मोहीम सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भाजपचे कार्यकर्ते देशभरातील मुस्लिम समुदायातील लोकांमध्ये जाऊन त्यांना 'सौगत-ए-मोदी' किट देतील. ईदीच्या निमित्ताने या किटचे वाटप केले जाईल. सौगात-ए-मोदींचे सर्वात मोठे लक्ष बिहार विधानसभा निवडणुकांवर आहे. मात्र यावरुनच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने आता हिंदुत्व सोडून टाकल्याची घोषणा करावी असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"शिवसेनेला मुस्लीम समाजाने मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. मुस्लीम समाज शिवसेनेवर विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते. त्यांनी लगेच म्हटलं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. आता मला एका गोष्टीचे समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते त्यांना पाचर बसली आहे. कारण ईदच्या निमित्ताने सौगात ए मोदी हा कार्यक्रम भाजपने हाती घेतला आहे. ३५ लाख मुस्लीम कुटुंबियांच्या घरी जाऊन भाजप कार्यकर्ते त्यांना सौगात ए मोदी देणार आहेत. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचे हे एक उदाहरण आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देणारे आता भेट द्यायला चालले आहेत. आयुष्यभर मुस्लीम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि  निवडणूक आल्यावर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे. याच्यात एक गोष्ट चांगली आहे. आमच्याकडचे जे काही उडाणटप्पू आहेत ते टोपी घालून कशी सौगात घेऊन जातात ते मला बघायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

"मला चिंता एकाच गोष्टीची आहे. पंतप्रधान मोदी लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते की मंगळसूत्र चोरलं जाणार. पण आता हिंदुंच्या मंगळसुत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे की निवडणुकीपूरती? सौगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपूरती राहणार आहे की नंतरही राहणार आहे हे भाजपने जाहीर करावं," असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

"भाजपने आता घोषणा करायला हवी की त्यांनी हिंदुत्व सोडून टाकलं. इतके वर्षे त्यांनी हिंदू मुस्लीमांमध्ये भांडणे लावली. काही जणांच्या घरावर बुलडोझर चालवले. त्यांच्या घरी सौगात घेऊन कोण जाणार हे सुद्धा त्यांनी जाहीर करावं," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRamzan Eidरमजान ईदNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा