शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला दिला मोठा धक्का; दिल्ली निवडणुकीसाठी संजय राऊतांनी दिला होता सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:45 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

Delhi Assembly elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी तुटल्याचे पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसनंतर आता आणखी एका पक्षाने काँग्रेसला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ममता बॅनर्जींपाठोपाठ दिल्लीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला मोठा धक्का दिला. दिल्ली विधानसभेसाठी तिरंगी लढत होताना दिसत आहे. अशातच इंडिया आघाडीचा भाग असलेल्या उद्धव ठाकरेंनी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला समर्थन दिलं आहे. उद्धव गटाचे खासदार अनिल देसाई या संदर्भात माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला पाठिंबा देत आहोत, कारण आम आदमी पक्षाने महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता, असं अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्ष असून दिल्लीत आम आदमी पक्षाविरुद्ध काँग्रेस निवडणूक लढवत असल्याबद्दल बोलताना अनिल देसाई यांनी आम्हाला आशा आहे की दिल्लीत मतांचे विभाजन होणार नाही, असं म्हटलं.

यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आप आणि काँग्रेसला एकत्र येण्याचा सल्ला दिला होता. "आम आदमी पक्ष आणि काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले, त्यामुळे मोदींना रोखण्यात आम्ही यशस्वी झालो, पण विधानसभेत ज्या प्रकारे फ्री स्टाइल कुस्ती सुरू आहे, ती देश पाहत आहे. चार वर्षांनंतर जनता आम्हाला प्रश्न करेल. आमचा शत्रू भाजप आहे, काँग्रेस किंवा आप नाही. आपण एकत्र राहिलो तरच देशाला पुढे नेऊ शकतो," असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेपूर्वी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आपला पाठिंबा जाहीर केला होता. "दिल्लीतील लोकांसोबत होणारा भेदभाव आपण पाहिला आहे. मी अरविंद केजरीवालजींचे अभिनंदन करतो की एवढे होऊनही त्यांची हिंमत कमी झालेली नाही. समाजवादी पक्ष पूर्ण जबाबदारीने तुमच्या पाठीशी उभा आहे, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जेव्हा तुम्हाला समर्थन आणि मदतीची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू," असं अखिलेश यादव यांनी म्हटलं.

यासोबतच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनेही आपला पाठिंबा जाहीर केला. तृणमूल नेते कुणाल घोष म्हणाले की, आम्हाला आशा आहे की दिल्लीत पुन्हा आम आदमी पार्टीचे सरकार येईल. दिल्लीत भाजप संपूण जाईल.

दरम्यान, दिल्लीत आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. दिल्लीतील सर्व ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. गेली १० वर्षे दिल्लीत आपची सत्ता आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेस