शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
3
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
4
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
5
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
8
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
9
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
10
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
11
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
12
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
13
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
14
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
15
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
16
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
17
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
18
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
19
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
20
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंना कोणतेही निमंत्रण मिळालेले नाही- संजय राऊत

By admin | Published: March 26, 2017 8:40 PM

पंतप्रधान मोदींनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना 29 मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले

सुरेश भटेवरा/ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेतील तणाव दूर करण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान मोदींनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना 29 मार्च रोजीच्या एनडीए बैठकीच्या स्नेहभोजनाचे निमंत्रण पाठवले, अशी चर्चा राजधानी दिल्लीत सुरू आहे. तथापि असे कोणतेही निमंत्रण अधिकृतरीत्या शिवसेना प्रमुखांना प्राप्त झालेले नाही अथवा पंतप्रधानांनी उद्धव ठाकरेंना तसा फोनही केलेला नाही, असा खुलासा निसंदिग्ध शब्दात शिवसेनेचे राज्यसभेतील प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना केला.संभाव्य निमंत्रणाबाबत मिश्कील शैलीत बोलताना संजय राऊत म्हणाले, तूर्त तरी केवळ चर्चेत असलेले हे निमंत्रण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा पाठिंबा मागण्यासाठी असेल तर ही चर्चा आणि स्नेहभोजन मातोश्रीवरच होईल. याचे कारण यापूर्वीच्या दोन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्याची सारी चर्चा मातोश्रीवरच झाली होती. तथापि शिवसेनाच काय तर एनडीएच्या कोणत्याही घटक पक्षाच्या नेत्याला आजवर माझ्या माहितीनुसार पंतप्रधानांकडून असे निमंत्रण प्राप्त झालेले नाही. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर देखील भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी आघाडीतील दोन प्रमुख पक्षांमधले ताणतणाव अद्याप दूर झालेले नाहीत. प्रचारसभांमध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्ला चढवल्यामुळे भाजपामध्ये कमालीची नाराजी आहे. शिवसेनेच्या कडवट हल्ल्यांमुळे भाजपा वैतागला असून राज्यात लवकरात लवकर उभय पक्षांची युती संपावी, अशी काही नेत्यांची मनोमन इच्छा आहे, असे समजले. तथापि याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्त न करता अतिशय सावध पवित्रा भाजप नेत्यांनी स्वीकारला आहे. मुंबईत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी भाजपाच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच एक बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. बैठकीने राज्य सरकारवर शिवसेनेद्वारे सातत्याने सुरू असलेल्या शरसंधानाची गंभीर दखल घेतली व अन्य पर्यायांवरही चर्चा केल्याचे समजले. तथापि शिवसेनेशी असलेल्या युतीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, २९ मार्चच्या प्रस्तावित स्नेहभोजनासाठी पंतप्रधान मोदींचे उद्धव ठाकरेंना येऊ घातलेले निमंत्रण, हा उभय पक्षात सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी भाजपतर्फे एक महत्त्वाचा की (अखेरचा) प्रयत्न असावा, असे बोलले जाते. महाराष्ट्र विधानसभेत २८८ सदस्यांच्या सभागृहात भाजपाचे १२२ सदस्य आहेत. बहुमतासाठी भाजपाला २३ मतांची कमतरता आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण २0 सदस्य आहेत. यापैकी १३ सदस्यांचा पाठिंबा भाजपाला आहे. याचा अर्थ आणखी फक्त १0 आमदारांच्या पाठिंब्याची भाजपाला आवश्यकता आहे. युती तोडून शिवसेनेच्या ६३ आमदारांच्या पाठिंब्याला तिलांजली देण्यापूर्वी राज्यात अन्य कोणते पर्याय भाजपाकडे उपलब्ध आहेत, याची चाचपणी सुरू असतानाच, पंतप्रधान मोदी ठाकरेंना खास निमंत्रण पाठवणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने हा घटनाक्रम अधिकच लक्षवेधी बनला आहे.