शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 23:03 IST

तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. 

ठळक मुद्देदोनवेळा आमदार असलेल्या दीपक हलदर यांचा पक्षाला रामरामदीपक हलदर यांचा राजीनामा हा ममता बॅनर्जीसाठी मोठा धक्का लवकरच भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता :पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. 

आमदार दीपक हलदर यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण दीपक हलदर हे डायमंड हार्बर या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे दीपक हलदर यांनी सोमवारी जाहीर केले. 

दीपक हलदर यांचे म्हणणे काय?

तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देताना दीपक हलदर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मात्र, सन २०१७ पासून सर्वांसोबत काम करण्यापासून मला परावृत्त केले जात होते. माझ्या कोणत्याही गोष्टीला मान्यता, परवानगी दिली जात नव्हती. पक्षनेतृत्वाला याची वेळोवेळी कल्पना देऊनही दखल घेतली नाही. अथवा कोणतीच कारवाई केली गेली नाही. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाची मला दिली जात नव्हती. विधानसभा मतदारसंघातील जनता आणि समर्थकांना उत्तरे देण्यास मी बांधील आहे. म्हणूनच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे दीपक हलदर यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

भाजप नेते सोवन चॅटर्जी संपर्कात

गेल्या काही दिवसांपासून दीपक हलदर पक्षनेतृत्वाविरोधात जाहीरपणे वक्तव्ये करत होते, असे सांगितले जात आहे. भाजप नेते सोवन चॅटर्जी यांच्याशी संपर्कात असून, दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी भेटही दिली होती. सन २०१५ मध्ये मारहाणीच्या आरोपामुळे दीपक हलदर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, अशी माहिती मिळाली आहे. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. हावडा रॅलीत सुवेंदू अधिकारी यांनीही सहभागी होत तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. 

टॅग्स :Politicsराजकारणtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी