शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा सत्र सुरूच; आमदार दीपक हलदर यांची तृणमूलला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाची शक्यता

By देवेश फडके | Updated: February 1, 2021 23:03 IST

तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. 

ठळक मुद्देदोनवेळा आमदार असलेल्या दीपक हलदर यांचा पक्षाला रामरामदीपक हलदर यांचा राजीनामा हा ममता बॅनर्जीसाठी मोठा धक्का लवकरच भाजप प्रवेशाची शक्यता

कोलकाता :पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापत चालले आहे. तृणमूल काँग्रेसमधील नेते, आमदार यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केल्यानंतर आता आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. 

आमदार दीपक हलदर यांनी तृणमूल काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी हा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण दीपक हलदर हे डायमंड हार्बर या मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याचे दीपक हलदर यांनी सोमवारी जाहीर केले. 

दीपक हलदर यांचे म्हणणे काय?

तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देताना दीपक हलदर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मात्र, सन २०१७ पासून सर्वांसोबत काम करण्यापासून मला परावृत्त केले जात होते. माझ्या कोणत्याही गोष्टीला मान्यता, परवानगी दिली जात नव्हती. पक्षनेतृत्वाला याची वेळोवेळी कल्पना देऊनही दखल घेतली नाही. अथवा कोणतीच कारवाई केली गेली नाही. पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाची मला दिली जात नव्हती. विधानसभा मतदारसंघातील जनता आणि समर्थकांना उत्तरे देण्यास मी बांधील आहे. म्हणूनच तृणमूल काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असे दीपक हलदर यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा एल्गार! संपूर्ण देशभरात ०६ फेब्रुवारीला करणार रास्ता रोको

भाजप नेते सोवन चॅटर्जी संपर्कात

गेल्या काही दिवसांपासून दीपक हलदर पक्षनेतृत्वाविरोधात जाहीरपणे वक्तव्ये करत होते, असे सांगितले जात आहे. भाजप नेते सोवन चॅटर्जी यांच्याशी संपर्कात असून, दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या निवासस्थानी भेटही दिली होती. सन २०१५ मध्ये मारहाणीच्या आरोपामुळे दीपक हलदर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र, जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला, अशी माहिती मिळाली आहे. 

आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे

पश्चिम बंगालमध्ये आम्हाला डबल इंजिन असलेले सरकार हवे आहे. सोनार बांगलासाठी केंद्रात आणि राज्यात म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार असणे गरजेचे आहे, असे भाजप नेते राजीव बॅनर्जी यांनी सांगितले. हावडा रॅलीत सुवेंदू अधिकारी यांनीही सहभागी होत तृणमूल काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. 

टॅग्स :Politicsराजकारणtmcठाणे महापालिकाwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जी