शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

PM मोदी-नितीश कुमारांची मैत्री करून देणारे दोन 'Real Hero'; अशी आहे पडद्यामागची संपूर्ण 'स्टोरी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:41 IST

खरे तर राजकारण असो वा कुठलेही एखादे मिशण त्यात काही लोक पडद्यामागे राहून आपली भूमिकाही बजावत असतात. बिहारमध्येही भाजपा आणि जेडियू यांची मैत्री घडून आणण्यात पडद्या मागे राहून काम करणाऱ्या अशाच दोन व्यक्तींची महत्वाची भूमिका आहे. 

I.N.D.I.A. चा हात सोडून NDA ची गळाभेट घेत नितीश कुमार यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि बिहारमध्ये डबल इंजिन सरकारला सुरुवात झाली. हा भाजपच्या 2024 च्या यशाच्या दृष्टीने सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे. खरे तर हा भाजपची चौकडी अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बिहारचे प्रभारी विनोद तावडे यांच्या उपक्रमाचे मोठे यश आहे.

खरे तर राजकारण असो वा कुठलेही एखादे मिशण त्यात काही लोक पडद्यामागे राहून आपली भूमिकाही बजावत असतात. बिहारमध्येही भाजपा आणि जेडियू यांची मैत्री घडून आणण्यात पडद्या मागे राहून काम करणाऱ्या अशाच दोन व्यक्तींची महत्वाची भूमिका आहे. 

बिहार-झारखंडचे क्षेत्रीय संघटन महामंत्री नागेंद्र जी -नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमध्ये डबल इंजिन सरकार स्थापन होण्यात भाजपकडून मुख्य भूमिका, बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संगटन महामंत्री नागेंद्र जी अर्थात नागेंद्र नाथ त्रिपाठी यांना मानले जात आहे. यापूर्वी ते बिहारचे संघटन महामंत्री होते. ते उत्‍तर प्रदेशातही आठ वर्षांपर्यंत संघटन महामंत्री राहिले आहेत.

बिहारच्या राजकारणात एनडीएच्या राजकारणाला बळकटी देण्याचे श्रेय नागेंद्र जी यांना जाते. मिशन 2024 साठी जेडीयूकडून जे प्रस्ताव त्यांच्याकडे आले, ते त्यांनी केंद्रीय रणनीतीकारांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. तसेच जेव्हा जेव्हा मतभेदाचा मुद्दा निर्माण झाला, तेव्हा- तेव्हा ती दरी भरून काढण्याचे कामही त्यांनी केले. आज सरकारमध्ये एनडीएची जी छबी दिसत आहे, ती त्यांनी जेडीयू नेते तथा मुख्यमंत्र्यांचे सल्लागार केसी त्यागी यांच्यासमवेत तयार केला आहे. 

जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी देखील उत्तर प्रदेशातून येतात. हे नितीश कुमार यांचे अत्यंत जवळचे आणि मुख्य रणनितीकारही आहेत. राजकारणाच्या पटावर, मुख्यत्वे युती अथवा आघाडीच्या राजकारणात निवडणुकांमध्ये भाग घेण्यासंदर्भात अनेक किंतु-परंतु असतात. हे सोडविण्यात केसी त्यागी यांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. केसी त्यागी आणि नागेंद्र जी हे दोघेही उत्तरप्रदेशचे असल्याने त्यंचे ट्यूनिंगदेखील चांगले आहे.

भाजपचे बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संगटन महामंत्री नागेंद्र नाथ त्रिपाठी आणि जेडीयूचे मुख्य प्रवक्ते केसी त्यागी.महत्वाचे म्हणजे, बिहारमध्ये पुन्हा एकदा डबल इंजिन सरकार स्थापन होण्यासाठी, जो काही अंतर्गत मसुदा तायर करण्यात आला तो या दोघांच्याही राजकीय परिपक्वतेचा परिपाक आहे. अंतिमतः भाजप आणि जेडीयूच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्याला मंजुरी दिल्यानंतर, बिहारमध्ये डबल इंजिन सरकार स्थापन होऊ शकले आहे.

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण