शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:25 IST

देशातील दोन मोठ्या पक्षांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा अथवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे...!

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला केवळ एक दिवस शिल्लक असतानाच, देशातील दोन मोठ्या पक्षांनी या निवडणुकीपासून दूर राहण्याचा अथवा तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. एक म्हणजे, नवीन पटनायक यांचा बीजू जनता दल (BJD), तर दुसरा म्हणजे, के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वातील भारत राष्ट्र समिति (BRS). महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय पातळीवर हे दोन्ही पक्ष सत्ताधारी NDA आणि विरोधकांच्या I.N.D.I.A. चा भाग नाहीत.

बीजू जनता दलाची घोषणा -पक्षप्रमुख नवीन पटनायक दिल्लीत पोहोचल्यानंतर, बीजदने या निर्णयासंदर्भात माहिती दिली. खरे तर, या निवडणुकीपासून बीजू जनतादल दूर राहिल, असा अंदाज आधापासूनच लावला जात होता. महत्वाचे म्हणजे, आपण सत्ताधआरी NDA आणि विरोधकांच्या I.N.D.I.A. पासूनही दूरच राहणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

काय असू शकतं कारण?बीजू जनतादलाच्या या निर्णयामागचे कारण म्हणजे, तटस्थ राहण्याची रणनीती मानले जात आहे. असे मानले जाते की, त्यांना एनडीएला नाराजही करायचे नाही आणि त्यांच्या बाजूनेही उभे रहायचे नाही. महत्वाचे म्हणजे, राष्ट्रीय राजकारणात, नवीन पटनायक यांचा हा पक्ष, अनेक वेळा सत्ताधारी पक्षासोबत राहिला आहे अथवा तटस्थ तरी राहिला आहे. गेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत बीजेडीने एनडीएच्या उमेदवाराला मतदान केले होते.

यासंदर्भात बोलताना बीजद खासदार सास्मित पात्रा म्हणाले, 'बीजू जनता दलाने उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीजू जनता दल NDA आणि INDIA या दोघांपासूनही दूर राहील. आपमेच लक्ष्य ओडिशाचा विकास, कल्याण आणि ओडिशातील 4.5 कोटी लोक आहेत.'

गेल्या काही वर्षांत अशा निवडणुकांमध्ये बीजेडीने राष्ट्रीय पातळीवर भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ते संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पराभव झाल्यानंतर, बीजेडी आता राज्यातील मुख्य विरोधी पक्ष आहे.

बीआरएसचा निर्णय - यासंदर्भात बोलताना, बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामा राव सोमवारी म्हणाले, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय म्हणजे, राज्यातील युरियाच्या कमतरतेसंदर्भात तेलंगणातील शेतकऱ्यांच्या वेदनेची अभिव्यक्ती आहे. यावेळीत्यांनी,  युरियाचा प्रश्न सोडवण्यात भाजप आणि काँग्रेस दोघेही अपयशी ठरल्याचा आरोपही केला. युरियाचा तुटवडा एवढा गंभीर आहे की, रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होत आहे, असेही केटीआर म्हणाले. एवढेच नाही तर, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नोटा पर्याय उपलब्ध असता, तर बीआरएस त्याचा वापर करू शकली असती, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाParliamentसंसदNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समिती