भारतात गॅस वापरणाऱ्यांची संख्या किती आहे, असा प्रश्न देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईनंतर चर्चेत आला आहे. १४० कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारतात तेल आणि गॅस यांची गरज जास्त आयाती करूनच भागवली जाते. गॅस तर थेट स्वयंपाक घराशी जोडलेला असल्याने युद्धाचा परिणाम प्रकर्षाने जाणवू लागला आहे.
केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानुसार, देशात ३३ कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यातील बहुतांश घरांमध्ये दोन सिलेंडर आहेत. याच प्रमाणाने विचार केला तर देशातील सिलेंडरची संख्या ६६ कोटीपर्यंत असू शकते.
यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत देण्यात आलेल्या गॅस कनेक्शनचाही समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गॅस वापरणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढली. त्याचबरोबर देशात व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरची संख्याही प्रचंड आहे.
सरकारच्या आकडेवारीनुसार, देशात १०१४ मध्ये एलपीजी कनेक्शनची संख्या १४.५ कोटी इतकी होती. मागील दहा वर्षांमध्ये ही संख्या दुप्पट म्हणजे ३३ कोटीपर्यंत पोहोचली आहे. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत १०.४ कोटी गरीब कुटुंबांकडे एलपीजी कनेक्शन आहेत.
शहरांमध्ये पाईपद्वारे गॅस पुरवठा गेला जातो. पीएनजी कनेक्शनची संख्याही हळूहळू वाढू लागली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या देशात १.५ कोटी पीएनजी कनेक्शन आहेत. ही सुविधा सध्या महानगरांमध्येच आहे.
Web Summary : India has 33 crore LPG connections, potentially 66 crore cylinders, many with two per household. The Ujjwala scheme boosted rural gas access. PNG connections are growing, mainly in cities. LPG connections have doubled in ten years, now reaching 33 crore.
Web Summary : भारत में 33 करोड़ एलपीजी कनेक्शन हैं, संभावित रूप से 66 करोड़ सिलेंडर, कई घरों में दो सिलेंडर हैं। उज्ज्वला योजना ने ग्रामीण गैस पहुंच को बढ़ावा दिया। पीएनजी कनेक्शन बढ़ रहे हैं, मुख्य रूप से शहरों में। दस वर्षों में एलपीजी कनेक्शन दोगुने हो गए हैं, अब 33 करोड़ तक पहुंच गए हैं।