शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 22:06 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. 

Rahul gandhi News: काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बिहारच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात राहुल गांधींनी काही कार्यक्रमांना हजेरी लावली. पण, याच दौऱ्यात त्यांच्याविरोधात दोन एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत. यात पोलिसांनी राहुल गांधींसह २० नेते आणि इतर १०० अज्ञातांना आरोपी बनवले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

राहुल गांधी यांनी दरंभगामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांची भेट घेतली. ही भेट आंबेडकर वसतिगृहात झाली. या भेटीसाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नव्हती, अशी माहिती आता समोर आली आहे. 

प्रशासनाने दावा केला की, वसतिगृहात कोणत्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली गेली नव्हती. तरीही राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कार्यक्रम आयोजित केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन गु्न्हे दाखल केले आहेत. दोन्ही एफआरआयमध्ये राहुल गांधींचे नाव आहे. 

राहुल गांधींविरोधात दोन एफआरआय कशाच्या?

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला एफआरआय भारतीय न्याय संहितेतील कलम १६३ चे उल्लंघन केल्या प्रकरणी नोंदवण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी तिथे हजर असलेले जिल्हाधिकारी खुर्शीद आलम यांनी ही तक्रार दिली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम घेतला, असे या एफआरआयमध्ये म्हटलेले आहे. 

वाचा >>23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया

दुसरा एफआरआय आंबेडकर कल्याण वसतिगृहात परवानगी नसताना कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नोंदवण्यात आला आहे. याला जिल्हा विकास अधिकारी अलोक कुमार यांनी दुजोरा दिला आहे. 

वसतिगृहात बळजबरी प्रवेश करून तिथे राजकीय कार्यक्रम घेण्यात आल्याची ही तक्रार आहे. याला दरभंगाचे एसडीपीओ अमित कुमार आणि एडीएम विकास कुमार यांनी दुजोरा दिला आहे. 

माझ्यासाठी हे मेडल आहेत - राहुल गांधी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, "माझ्यासाठी हे मेडल्स आहेत. माझ्याविरोधात ३०-३२ गुन्हे आहेत. मी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडला होता. हेही म्हटलो होतो की, खासगी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात जे कायदे आहेत, ते लागू करायला पाहिजेत. त्याचसोबत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवली पाहिजे. या आमच्या मागण्या आहेत आणि आम्ही त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBiharबिहारcongressकाँग्रेसPoliceपोलिसreservationआरक्षण