शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

'ट्रूडो यांनी केले आरोप...', भारत आणि कॅनडामधील वादावर अमेरिकेची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 13:34 IST

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केला आहे.

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंहच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडाने सोमवारी एका सर्वोच्च भारतीय मुत्सद्याची हकालपट्टी केली, त्यानंतर भारताने कॅनडाच्या एका उच्च राजनयिकाला पाच दिवसांच्या आत देश सोडण्याचे आदेशही जारी केले आहेत. एका खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडात सुरू असलेल्या तणावावर आता अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. कॅनडाच्या सरे शहरात एका 'शीख कार्यकर्त्या'च्या हत्येप्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांमुळे अमेरिकेने 'अत्यंत चिंतित' असल्याचे म्हटले आहे. 

एकाच फ्रेममध्ये ७९५ खासदार; जुन्या संसदेत सत्ताधारी अन् विरोधकांचं एकत्र फोटोशूट

व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते अॅड्रिन वॉटसन म्हणाले, 'पंतप्रधान ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांबद्दल आम्ही अत्यंत चिंतित आहोत. आम्ही आमच्या कॅनेडियन सहकाऱ्यांच्या नियमित संपर्कात राहतो. कॅनडाने तपास करून दोषींना न्याय मिळवून देणे अत्यावश्यक आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी कॅनडाच्या संसदेत, हाऊस ऑफ कॉमन्समध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाबद्दल बोलले. ते म्हणाले होते, 'कॅनडियन सुरक्षा एजन्सी भारत सरकार आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येतील संबंधांच्या आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत. कॅनडाच्या भूमीवर कॅनेडियन नागरिकाच्या हत्येत कोणत्याही परदेशी सरकारचा सहभाग खपवून घेतला जाणार नाही. हे आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. 

यानंतर कॅनडाने भारताच्या एका उच्चपदस्थ मुत्सद्याची हकालपट्टी करण्याची घोषणा केली. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'आम्ही भारतातील एका प्रतिष्ठित राजनयिकाची हकालपट्टी करत आहोत. पण आपण या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊ, जर हे सर्व सत्य सिद्ध झाले तर ते आपल्या सार्वभौमत्वाचे आदर करण्याच्या मूलभूत नियमाचे उल्लंघन होईल.

भारताने कॅनडाच्या सरकारने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. भारताचे म्हणणे आहे की, कॅनडातील हिंसाचाराच्या कोणत्याही घटनेत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप मूर्खपणाचा आणि प्रेरित आहे. प्रत्युत्तर म्हणून, भारताने मंगळवारी कॅनडाच्या उच्चायुक्तांना बोलावले आणि त्यांना कॅनडाच्या उच्च मुत्सद्द्याला बाहेर काढल्याची माहिती दिली. भारताने कॅनडाच्या राजनैतिकाला देश सोडण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयCanadaकॅनडा