ट्रकचोर टोळी गजाआड
By Admin | Updated: August 14, 2015 23:35 IST2015-08-14T23:35:05+5:302015-08-14T23:35:05+5:30
(फोटो)

ट्रकचोर टोळी गजाआड
(फ ोटो)ट्रकचोरी टोळी गजाआड५६ लाखांचा ऐवज जप्त : बुटीबोरी पोलिसांची कारवाई बुटीबोरी : परिसरातील टोल नाक्याजवळ उभा असलेला ट्रक साहित्यासह चोरून त्यातील साहित्य व ट्रकची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीस अटक करण्यात बुटीबोरी पोलिसांना यश आले. चोरीची ही घटना २७ जानेवारी २०१५ रोजी रात्री ८.१५ वाजातच्या सुमारास घडली होती. यात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३६ लाख ६५ हजार ६६० रुपये किमतीचे ट्रकमधील साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. राजू जगन सिंह (४५, रा. सडौली, जिल्हा भरतपूर, राजस्थान), रामधार रघुवीरसिंह (४७, चमरपूर, जिल्हा धौलपूर, राजस्थान), गुरुविंदर ऊर्फ काके (४२, जलालपूर, ग्वालियर, मध्य प्रदेश), बिल्ला सरदार (५४, रा. जनपद, झाशी, मध्य प्रदेश), हरीश मनोहरलाल टेमला (४०, मनानीनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी प्रेम प्रकाश सिंग (५०, रा. उधमसिंहनगर, उत्तराखंड) यांची हैदराबाद येथे हिंदुस्थान झिंक लि. नामक कंपनी आहे. त्यांनी टीएन-९०/५५५० क्रमांकाचा ट्रक किरायाने घेतला होता. हा ट्रक ८०० नग झिंक व २० बंडल घेऊन जात होता. दरम्यान, काही कारणास्तव चालकाने हा ट्रक बुटीबोरी परिसरातील बंद असलेल्या टोलनाक्याजवळ उभा केला. चोरट्यांनी तो पळविला.दरम्यान, हा ट्रक आग्रा (उत्तर प्रदेश) परिसरातील सिकंदरा भागात उभा असल्याची गुप्त माहिती बुटीबोरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच आग्रा गाठत राजू आणि रामधार या दोघांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. या दोघांनी गुरुविंदर व बिल्ला या दोघांची नावे सांगितल्याने त्यांनाही मध्य प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले. या चौघांनी हा ट्रक चोरून नेल्याचे कबूल केले तसेच तो हरीशला विकल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी लगेच पुणे गाठून हरीशला ताब्यात घेतले. या कारवाईत आरोपींकडून २० लाख रुपये किमतीचा ट्रक आणि ३६ लाख ६५ हजार ६६० रुपये किमतीचे ट्रकमधील साहित्य जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक महेश मेश्राम, आशिष, नितीन, नंदू आदींनी बजावली. (प्रतिनिधी)***