शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 15:42 IST

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Accident on Delhi-Mumbai Expressway : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर रविवारी(दि.4) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिली, यानंतर ट्रक चालकाने गाडी थांबवण्याऐवजी कारला 1KM फरफटत नेले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील विक्रमगड अलोटचे रहिवासी असलेले कुटुंब ऋषिकेशवरुन आपल्या गावी परतत होते. या दरम्यान, त्यांची भरधाव कार सवाई माधोपूर जिल्ह्यातील सुरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास नदीच्या पुलावर दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढे जाणाऱ्या ट्रकला दोराने धडकली. 

ट्रक चालकाने कार एक किलोमीटरपर्यंत खेचलीअपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत खेचली. यानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे मृतदेह अडकले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघाताचे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. 

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चारही मृतांचे मृतदेह सवाई माधोपूर जिल्हा मुख्यालयाच्या सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. मृतांमध्ये राजन, मोनिका, रेखा आणि धापू प्रजापत यांचा समावेश आहे. याशिवाय जखमींमध्ये पायल प्रजापत, बुलबुल प्रजापत, ज्योती प्रजापत, कृष्णा प्रजापत आणि कार चालक शकील खानसह लहान मुलगी अनिता यांचा समावेश आहे. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईdelhiदिल्ली