शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 15:42 IST

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Accident on Delhi-Mumbai Expressway : राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर रविवारी(दि.4) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कारने ट्रकला मागून धडक दिली, यानंतर ट्रक चालकाने गाडी थांबवण्याऐवजी कारला 1KM फरफटत नेले. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील विक्रमगड अलोटचे रहिवासी असलेले कुटुंब ऋषिकेशवरुन आपल्या गावी परतत होते. या दरम्यान, त्यांची भरधाव कार सवाई माधोपूर जिल्ह्यातील सुरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बनास नदीच्या पुलावर दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवर पुढे जाणाऱ्या ट्रकला दोराने धडकली. 

ट्रक चालकाने कार एक किलोमीटरपर्यंत खेचलीअपघातानंतरही ट्रकचालकाने कार सुमारे एक किलोमीटरपर्यंत खेचली. यानंतर चालकाने ट्रकसह घटनास्थळावरुन पळ काढला. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. कारमधून प्रवास करणाऱ्या लोकांचे मृतदेह अडकले होते. मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. अपघाताचे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. 

या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. चारही मृतांचे मृतदेह सवाई माधोपूर जिल्हा मुख्यालयाच्या सामान्य रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. मृतांमध्ये राजन, मोनिका, रेखा आणि धापू प्रजापत यांचा समावेश आहे. याशिवाय जखमींमध्ये पायल प्रजापत, बुलबुल प्रजापत, ज्योती प्रजापत, कृष्णा प्रजापत आणि कार चालक शकील खानसह लहान मुलगी अनिता यांचा समावेश आहे. चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईdelhiदिल्ली